शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

'लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापताय, मग डेथ सर्टीफिकेटचीही जबाबदारी घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:55 IST

कोविड काळात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळून नियंत्रण प्रस्थापित केल्याचे कोल्हे यांनी ससंदेत सांगितले.

ठळक मुद्देकोविड काळात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळून नियंत्रण प्रस्थापित केल्याचे कोल्हे यांनी ससंदेत सांगितले

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेतील भाषण चर्चेचा विषय बनलं आहे. कोरोना विषयावरील चर्चासत्रात खासदार कोल्हेंनी तुफान फटकेबाजी करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुकही केले. ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काय तयारी केली आहे, असा सवालही कोल्हेंनी लोकसभेत विचारला. 

अमोल कोल्हेंनी भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो छापून येतो, त्यावरुन कोल्हेंनी मोदी सरकारला टोला लगावला. "अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा", असे म्हणत कोरोनामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचीही जबाबदारी स्वीकारयला हवी, असे कोल्हेंनी म्हटले. दरम्यान, सिरम इन्स्टिट्युटच्या म्हणण्यानुसार जगभरात अनेक देशांनी कोविशिल्डच्या बुस्टर डोसची शिफारस केली असताना केंद्रसरकारने याबाबत काय विचार केला आहे काय? तसेच दोन्ही डोसमधले अंतर कमी करुन लसीकरण वाढवता येवू शकेल का? त्याचप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाची काय स्थिती आहे? या प्रश्नांची सरबत्तीच कोल्हेंनी केली. 

कोविड काळात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी राज्यात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळून नियंत्रण प्रस्थापित केल्याचे कोल्हे यांनी ससंदेत सांगितले. तर, कोरोनामुळे बळी पडलेल्या माता-पित्यांच्या अनाथ मुलांसाठी लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या कल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या 'राष्ट्रवादी जीवलग' अभियानाची माहिती देत हे अभियान देशभर राबविण्याची मागणीही त्यांनी केली. दुसऱ्या बाजूला बँकांनीही ईएमआयमध्ये सवलत दिली नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आपल्या भाषणाच्या शेवटी डॉ. कोल्हेंनी मोदींना उद्देशून कवितेच्या माध्यमातून टोला लगावला. 

"अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो,पराजय का बोझ भी स्वीकारना होगा"'जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी', असे कोल्हेंनी म्हटले.   

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या