शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पंतप्रधानपद, नो नो...! विरोधकांच्या एकजुटीची वेळ आली, नितीश कुमार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 09:25 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. माकपच्या कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांच्याशी चर्चा केल्यानंतर नितीशकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नवी दिल्ली : पंतप्रधानपदासाठी आपण ना दावेदार आहोत ना इच्छुक, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्षांना एकजूट करणे हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. माकपच्या कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांच्याशी चर्चा केल्यानंतर नितीशकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, डावे पक्ष, काँग्रेस आणि सर्व प्रादेशिक पक्ष यांना एकजूट करण्याची ही वेळ आहे. येचुरी म्हणाले की, नितीशकुमार यांचे विरोधी गटात परत येणे आणि भाजपविरुद्ध लढाईचा एक भाग बनण्याची त्यांची इच्छा हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे बदल आहेत.

नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ९० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर केजरीवाल यांनी ट्विट केले की, माझ्या घरी आल्याबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे धन्यवाद. भाजपतर्फे होत असलेल्या आमदार खरेदी, विरोधी पक्षांची राज्य सरकारे पाडण्यासाठी राबविण्यात येत असलेले ऑपरेशन लोटस या केंद्र सरकारच्या धोरणावर चर्चा झाल्याचे केजरीवाल म्हणाले. 

दिल्लीत भेटीगाठी भाजपसोबत वेगळे झाल्यानंतर नितीशकुमार हे प्रथमच सोमवारी दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली. सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे ओम प्रकाश चौटाला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांसोबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल