शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्राद्वारे साधला जनतेशी संवाद

By admin | Published: May 26, 2015 9:28 AM

मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २६ - मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. पहिल्या वर्षी विकास दर वाढल्याने देशाने गमावलेला विश्वास पुन्हा मिळवला आहे असे सांगत मोदींनी पत्राद्वारे 'मन की बात' केली आहे. 

मोदी सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाले असून या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून पत्र लिहीले आहे. देशभरातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये हे पत्र जाहिरात स्वरुपात छापण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात सरकारने राबवलेल्या योजनांचा लेखाजोखा या पत्रात मांडण्यात आला आहे. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक व धोरण आधारित प्रशासन हे आमचे मूलभूत सिद्धांत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. सत्तेवर आलो तेव्हा आर्थिक स्थिती डळमळीत होती, महागाई वाढत होती पण आता चित्र बदलत असल्याचा दावा मोदींनी केला आहे. मेक इन इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, मृदा आरोग्य कार्ड, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान अशा नवनवीन योजना राबवत असल्याचे मोदींनी पत्रात नमूद केले आहे.