शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

राजकीय घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडाडून टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:25 IST

दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षांची झाली अधोगती, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते

हैदराबाद : देशावर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षांची आता अधोगती झाली आहे. त्याबद्दल त्या पक्षांची थट्टा करू नये तर या पक्षांनी केलेल्या चुकांपासून आपण धडा घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. लांगूलचालन, घराणेशाहीला देशातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व यापुढे प्रदीर्घ काळ टिकणे अशक्य आहे, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात असताना, त्यांच्याच राज्यात भाजपने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक  आयोजित केली. दक्षिण भारतातील तेलंगणासह इतर राज्यांवर आपले यापुढे अधिक लक्ष असेल, असे या बैठकीतून भाजपने दाखवून दिले आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला जगात श्रेष्ठ बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. विरोधी पक्ष लांगूलचालनाचे राजकारण करतात. समाजातील सर्व घटकांचे कल्याण साधून भाजप कार्यकर्त्यांनी या राजकारणाला प्रत्युत्तर दिले पाहिजे.

हैदराबादला म्हणाले भाग्यनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचा पाया रचला. आता श्रेष्ठ (महान) भारत घडविण्याची कामगिरी भाजपला पार पाडायची आहे.

तेलंगणामध्ये डबल इंजिनचे सरकार सत्तेत आणा : मोदीतेलंगणात डबल इंजिनचे सरकार सत्तेत आल्यास या राज्याचा आणखी प्रचंड विकास होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जाहीर सभेत रविवारी सांगितले. ते म्हणाले की, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत तेलंगणामध्ये भाजपने जितके यश मिळविले त्यामध्ये त्यानंतरच्या कालावधीत आणखी वाढ झाली आहे.  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपानंतर मोदी यांची हैदराबादमध्ये जाहीर सभा झाली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपला जनतेने विजयी करावे. राज्य व केंद्रात डबल इंजिनचे सरकार असावे, असा जनतेने कौल द्यावा. डबल इंजिन सरकारमुळे तेलंगणातील शहरी, ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मूलमंत्र आहे. त्यानुसार आम्ही तेलंगणाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारच्या योजनांचा मोठा लाभ तेलंगणातील जनतेला मिळत आहे, असेही मोदी म्हणाले.

‘केसीआर सरकार घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक’तेलंगणामधील के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे सरकार हे घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक बनले आहे अशी टीका करणारा एक प्रस्ताव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या हैदराबाद येथे भरलेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, तेलंगणातील जनतेेसमोर असलेल्या सामाजिक, आर्थिक समस्यांमध्ये सतत वाढ होत आहे. केसीआर यांच्या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केसीआर व एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे दोघे मिळून तेलंगणाला लुटत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा