शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राजकीय घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडाडून टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:25 IST

दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षांची झाली अधोगती, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते

हैदराबाद : देशावर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षांची आता अधोगती झाली आहे. त्याबद्दल त्या पक्षांची थट्टा करू नये तर या पक्षांनी केलेल्या चुकांपासून आपण धडा घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. लांगूलचालन, घराणेशाहीला देशातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व यापुढे प्रदीर्घ काळ टिकणे अशक्य आहे, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात असताना, त्यांच्याच राज्यात भाजपने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक  आयोजित केली. दक्षिण भारतातील तेलंगणासह इतर राज्यांवर आपले यापुढे अधिक लक्ष असेल, असे या बैठकीतून भाजपने दाखवून दिले आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला जगात श्रेष्ठ बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. विरोधी पक्ष लांगूलचालनाचे राजकारण करतात. समाजातील सर्व घटकांचे कल्याण साधून भाजप कार्यकर्त्यांनी या राजकारणाला प्रत्युत्तर दिले पाहिजे.

हैदराबादला म्हणाले भाग्यनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचा पाया रचला. आता श्रेष्ठ (महान) भारत घडविण्याची कामगिरी भाजपला पार पाडायची आहे.

तेलंगणामध्ये डबल इंजिनचे सरकार सत्तेत आणा : मोदीतेलंगणात डबल इंजिनचे सरकार सत्तेत आल्यास या राज्याचा आणखी प्रचंड विकास होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जाहीर सभेत रविवारी सांगितले. ते म्हणाले की, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत तेलंगणामध्ये भाजपने जितके यश मिळविले त्यामध्ये त्यानंतरच्या कालावधीत आणखी वाढ झाली आहे.  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपानंतर मोदी यांची हैदराबादमध्ये जाहीर सभा झाली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपला जनतेने विजयी करावे. राज्य व केंद्रात डबल इंजिनचे सरकार असावे, असा जनतेने कौल द्यावा. डबल इंजिन सरकारमुळे तेलंगणातील शहरी, ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मूलमंत्र आहे. त्यानुसार आम्ही तेलंगणाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारच्या योजनांचा मोठा लाभ तेलंगणातील जनतेला मिळत आहे, असेही मोदी म्हणाले.

‘केसीआर सरकार घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक’तेलंगणामधील के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे सरकार हे घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक बनले आहे अशी टीका करणारा एक प्रस्ताव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या हैदराबाद येथे भरलेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, तेलंगणातील जनतेेसमोर असलेल्या सामाजिक, आर्थिक समस्यांमध्ये सतत वाढ होत आहे. केसीआर यांच्या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केसीआर व एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे दोघे मिळून तेलंगणाला लुटत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा