शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

AMUमध्ये मोदी म्हणाले, राजकारणापेक्षा समाज मोठा; जे देशाचं, ते देशातील प्रत्येक नागरिकाचं

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 22, 2020 14:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्यव्याला उत्तर म्हणून बघितले जात आहे. मनमोहन सिंगांच्या या वक्तव्यावरून भाजपने मोठा गदारोळ केला होता. (AMU)

ठळक मुद्देसंविधानात नागरिकांसाठी जे अधिकार आहेत, ते सर्वांनाच मिळाले आहेत - मोदीजे देशाचे आहे, ते देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे - मोदीआज प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारच्या भेद-भावाशिवाय विकासाचा फायदा मिळत आहे - मोदी

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी  महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठे राजकीय वक्तव्यही केले. "जे देशाचे आहे, ते देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे आणि संविधानात नागरिकांसाठी जे अधिकार आहेत, ते सर्वांनाच मिळाले आहेत," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

‘जे देशाचे, ते सर्वांचे’ - पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येकाची सेवा करा, मग त्याचा धर्म अथवा जात कुठलीही असो, असा संदेश सर सय्यद यांनी दिला आहे. याच प्रकारे, देशाला समृद्ध करण्यासाठी त्याचा प्रत्येक पातळीवर विकास होणे आवश्यक आहे. आज प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारच्या भेद-भावाशिवाय विकासाचा फायदा मिळत आहे. तसेच, नागरिकांनी संविधानने दिलेल्या अधिकारांसंदर्भात निश्चिंत रहावे, 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'च सर्वात मोठा मंत्र आहे.

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्यव्याला उत्तर म्हणूनही बघितले जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात डिसेंबर, 2006 मध्ये झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत बोलताना, ‘समाजातील सर्व मागास आणि अल्पसंख्याक वर्गाला विशेषत: मुस्लिमांना विकासाच्या लाभात बरोबरीचा वाटा निश्चित करण्यासाठी त्यांचे सशक्तिकरण करण्याची आवश्यकता आहे. देशातील संसाधनांवर पहिला अधिकार त्यांचाच आहे,’ असे म्हटले होते.

यावेळी भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. मनमोहन सिंगांच्या या वक्तव्यावरून भाजपने मोठा गदारोळ केला होता. नव्हे, काँग्रेस आणि तत्कालीन यूपीए सरकार मुस्लिमांच्या तुष्‍टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोपही भाजपने केला होता. एवढेच नाही, तर भाजपने दीर्घकाळ हा मद्दा उचलून धरला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगड मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलेले हे वक्तव्य मनमोहन सिंगांच्या वक्तव्याशी जोडले जात आहे. लाल बहादूर शास्त्रींनंतर नरेंद्र मोदी हे अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेणारे दुसरेच पंतप्रधान आहेत.

राजकारणापेक्षा समाज मोठा - पंतप्रधान मोदी म्हणाले, समाजात मतभेत असतात. मात्र, देशाच्या लक्ष्य प्राप्तीसाठी सर्व मतभेद बाजूला सारायला हवेत. देशात कुणीही कुठल्याही जाती अथवा धर्माचा असो, त्याने देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपले योगदान द्यायला हवे. मोदी म्हणाले, AMUमधून अनेक सेनानी बाहेर पडले आहेत. त्यांनी त्यांच्या विचाराला बाजूला सारत आपल्या देशासाठी लढा दिला. ते म्हणाले, राजकारण हे समाजाचे केवळ एक अंग आहे. मात्र, राजकारण आणि सत्तेपेक्षा देशातील समाज अधिक महत्वाचा असतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपाcongressकाँग्रेस