शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"आज मला पहिल्यांदा वस्तुस्थिती मांडायची आहे..."; राजीव गांधींचं नाव घेत PM मोदींचा काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:08 IST

मोदी म्हणाले, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधान झाल्यानंतर, त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. मात्र, पूर्वी एक असा कायदा होता, की त्या संपत्तीचा एक भाग त्यांना मिळण्यापूर्वी, सरकार घेत होते. तेव्हा...

काँग्रेसच्या राजघराण्यातील राजकुमार सध्या देशभराता फिरून सांगत आहेत की, आता तुमच्या मालमत्तेचा एक्स-रे होणार. आपल्या माता-भगिनींकडे असलेली पवित्र संपत्ती. मंगळसूत्र असो अथवा इतर कुठल्याही प्रकारचे दागिने असोत, ते पवित्र मानले जाते. काँग्रेस आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी ते जप्त करून वाटून टाकण्याची जाहीर घोषणा करत आहे. जाहीरनाम्यात सांगत आहे. एक्स-रे करून लोकांना लुटण्याचा प्लॅन आखत आहेत. एवढेच नाही, तर हे जिवंतपणी तर सोडाच, पण मृत्यूनंतरही आपल्या पश्चात राहिलेली संपत्ती, जी आपल्या मुला-मुलींना मिळायला हवी, तीही आपण देऊ शकणार नाही. 

मोदी म्हणाले, जर काँग्रेस सरकारमध्ये आली तर आपल्या कमाईचे अर्ध्याहून अधिक हिरावून घेईल. यासाठी काँग्रेसची वारसा टॅक्स लादण्याची तयारी आहे. वारसा टॅक्स (Inheritance Tax) संदर्भात जे तथ्य समोर येत आहेत, ते देशाचे डोळे उघडणारे आहे. पत्रकारांनीही ऐकावे. देशासोबत कसे कसे पाप झाले आहे, आज मी पहिल्यांदाच देशासमोर एक मजेशीर तथ्य मांडणार आहे.

मध्य प्रदेशातील मुरैना येथे बोलताना मोदी म्हणाले, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधान झाल्यानंतर, त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. मात्र, पूर्वी एक असा कायदा होता, की त्या संपत्तीचा एक भाग त्यांना मिळण्यापूर्वी, सरकार घेत होते. तेव्हा चर्चा होती की, इंदिरा जींच्या पश्चात त्यांची प्रॉपर्टी त्यांचा मुलगा राजीव गांधी यांना मिळणार होती. तेव्हा आपली प्रॉपर्टी वाचविण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधी जो Inheritance कायदा होता, तो संपुष्टात आणला आणि आपली संपत्ती वाचवली.

मोदी म्हणाले, जेव्हा स्वतःवर बितली तेव्हा कायदा बदलला आणि आता ते प्रकरण संपल्यानंतर, पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हे लोक तोच कायदा अधिक कडक करून परत आणण्याच्या विचारात आहेत. आपण अपल्या कुटुंबाची चार-चार पिढ्यांची प्रचं संपत्ती बिना टॅक्सची मिळवली आणि आता सर्वसामान्य जनतेच्या संपत्तीवर, कष्टाच्या कमाईवर टॅक्स लावून अर्धी संपत्ती लुटण्याचा विचा आहे. यामुळेच काँग्रेसची लूट म्हणजे, 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.' 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीIndira Gandhiइंदिरा गांधी