शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 200 सीईओंशी संवाद साधला, त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 19:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील 200 सीईओशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील काही मुद्दे 

नवी दिल्ली, दि. 22 -  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील 200 सीईओशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील काही मुद्दे 

- सरकार चालवताना लोकांचे कल्याण आणि नागरीकांच्या आनंदाला सर्वोच्च प्राथमिकता आहे. - प्रत्येक नागरीकाला देश आपला आहे असे वाटले पाहिजे, मला देशासाठी काहीतरी करायचे आहे. देशाच्या विकासात मला काहीतरी योगदान द्यायचे आहे असे प्रत्येक नागरीकाला वाटले पाहिजे.- प्रत्येक भारतीयाला भारत स्वतंत्र व्हावा असे वाटत होते, पण गांधीजींनी स्वातंत्र्य लढयात वेगळेपणा निर्माण केला. आपण देशांसाठी काम करतोय अशी भावना त्यांनी प्रत्येकामध्ये निर्माण केली. त्यांनी स्वातंत्र्याची लढाई एका मोठया चळवळीमध्ये बदलली. त्यानंतर काय घडले ते आपल्या सर्वांना माहिती आहे. - जे गांधीजींनी स्वातंत्र्य लढयाच्या बाबतीत केले तसेच आपल्याला भारताच्या विकासाला  मोठया चळवळीमध्ये बदलले पाहिजे. - आपण एकत्र मिळून काम करु तेव्हा देशासमोरच्या अनेक समस्या सोडवू शकतो. - इंडस्ट्री लीडर या नात्याने तुम्ही समाजातल्या गरीबातल्या गरीबासाठी काय करु शकता याचा विचार करा. - निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढीया यांच्या योगदानाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. 

वाजपेयी, मनमोहन सिंगांपेक्षा मोदींच्या काळात वेगाने झाल्या आर्थिक सुधारणा

तीन वर्षापूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताच्या आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिल्याचे अमेरिकेतील प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासक चेअर रिचर्ड एम रोसोने यांनी सांगितले आहे. भारताच्या आर्थिक विकासामध्ये त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांनाही मागे टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रपधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 37 क्षेत्रात मोठी सुधारणा केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात 29 क्षेत्रात सुधारणा झाली होती. तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात 19 तर दुसऱ्या कार्यकाळात 18 क्षेत्रात सुधारणा झाली आहे. बाह्य घटक आणि भारतातील विदेशी गुंतवणूक चालना मिळाली आहे. परकीय गुंतवणुकीला सरकारने केलेल्या सुधारणा आणि खुले केलेले धोरण, यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळून यात वाढ झाली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी