शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
4
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
5
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
6
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
7
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
8
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
9
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
10
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
11
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
12
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
13
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
14
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
15
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
16
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
17
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
18
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
19
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
20
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 200 सीईओंशी संवाद साधला, त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 19:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील 200 सीईओशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील काही मुद्दे 

नवी दिल्ली, दि. 22 -  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील 200 सीईओशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील काही मुद्दे 

- सरकार चालवताना लोकांचे कल्याण आणि नागरीकांच्या आनंदाला सर्वोच्च प्राथमिकता आहे. - प्रत्येक नागरीकाला देश आपला आहे असे वाटले पाहिजे, मला देशासाठी काहीतरी करायचे आहे. देशाच्या विकासात मला काहीतरी योगदान द्यायचे आहे असे प्रत्येक नागरीकाला वाटले पाहिजे.- प्रत्येक भारतीयाला भारत स्वतंत्र व्हावा असे वाटत होते, पण गांधीजींनी स्वातंत्र्य लढयात वेगळेपणा निर्माण केला. आपण देशांसाठी काम करतोय अशी भावना त्यांनी प्रत्येकामध्ये निर्माण केली. त्यांनी स्वातंत्र्याची लढाई एका मोठया चळवळीमध्ये बदलली. त्यानंतर काय घडले ते आपल्या सर्वांना माहिती आहे. - जे गांधीजींनी स्वातंत्र्य लढयाच्या बाबतीत केले तसेच आपल्याला भारताच्या विकासाला  मोठया चळवळीमध्ये बदलले पाहिजे. - आपण एकत्र मिळून काम करु तेव्हा देशासमोरच्या अनेक समस्या सोडवू शकतो. - इंडस्ट्री लीडर या नात्याने तुम्ही समाजातल्या गरीबातल्या गरीबासाठी काय करु शकता याचा विचार करा. - निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढीया यांच्या योगदानाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. 

वाजपेयी, मनमोहन सिंगांपेक्षा मोदींच्या काळात वेगाने झाल्या आर्थिक सुधारणा

तीन वर्षापूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताच्या आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिल्याचे अमेरिकेतील प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासक चेअर रिचर्ड एम रोसोने यांनी सांगितले आहे. भारताच्या आर्थिक विकासामध्ये त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांनाही मागे टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रपधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 37 क्षेत्रात मोठी सुधारणा केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या सहा वर्षाच्या कार्यकाळात 29 क्षेत्रात सुधारणा झाली होती. तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात 19 तर दुसऱ्या कार्यकाळात 18 क्षेत्रात सुधारणा झाली आहे. बाह्य घटक आणि भारतातील विदेशी गुंतवणूक चालना मिळाली आहे. परकीय गुंतवणुकीला सरकारने केलेल्या सुधारणा आणि खुले केलेले धोरण, यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळून यात वाढ झाली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी