शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला ट्विटरवर फॉलो करणे हे त्याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट नाही - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:56 IST

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं

नवी दिल्ली, दि. 8 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान भाजपाने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू मांडली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला फॉलो करणे हे त्या व्यक्तीचं चारित्र्य प्रमाणपत्र नाही. त्याचप्रमाणे ती व्यक्ती कसं वागेल याची ती गॅरंटीही नाही' असं भाजपाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालविया बोलले आहेत. हा वाद अयोग्य असल्याचंही ते बोलले आहेत. 

देशातील वातावरण बिघडवण्याचं काम करणा-या अनेकांना पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदींवर टीका केली होती. या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा विरोधकांना अश्लिल भाषेचा वापर करत धमक्या दिल्या जातात असा आरोप विरोधकांनी केला होता. 

अमित मालविया यांनी यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे बोट दाखवत त्यांच्या फॉलोअर्सकडून होणा-या अश्लिल भाषेचा वापर आणि धमक्यांबद्दल कोणी बोलत नसल्याचं सांगितलं. 'हा वाद फक्त हास्यास्पद आणि खोटा नाही, तर निवडक लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराचं प्रदर्शन आहे', असं अमित मालविया बोलले आहेत. 

यावेळा त्यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांसोबत मिसळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ख-या अर्थाने विश्वास असणारे मोदी दुर्मिळ नेते आहेत. त्यांनी ट्विटरवर कधीच कोणाला अनफॉलो केलेलं नाही'. याआधी पीएमओ हॅण्डलवरुन अनेकांना अनफॉलो करण्यात आलं होतं, पण मोदींनी तसं केलं नाही असं अमित मालविया यांनी सांगितलं आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनाही ट्विटरवर फॉलो करतात ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत. राहुल गांधींवर धोखाधडी केल्याचा आरोप आहे, तर अरविंद केजरीवाल वारंवार मोदींवर टिप्पणी करत असतात', असंही अमित मालविया बोलले आहेत. 

काँग्रेसने मात्र अमित मालविया यांच्या स्टेटमेंटमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलं आहे. पक्षाचा आणि भाजपा सरकारचा काय अजेंडा आहे हे लोकांना कळलं असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर आरएसएसने आनंद साजरा करत मिठाई वाटली होती, ज्यामुळे सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती याची आठवण मोदींना आणि भाजपाला काँग्रेसने करुन दिली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशBJPभाजपा