शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला ट्विटरवर फॉलो करणे हे त्याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट नाही - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:56 IST

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं

नवी दिल्ली, दि. 8 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान भाजपाने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू मांडली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला फॉलो करणे हे त्या व्यक्तीचं चारित्र्य प्रमाणपत्र नाही. त्याचप्रमाणे ती व्यक्ती कसं वागेल याची ती गॅरंटीही नाही' असं भाजपाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालविया बोलले आहेत. हा वाद अयोग्य असल्याचंही ते बोलले आहेत. 

देशातील वातावरण बिघडवण्याचं काम करणा-या अनेकांना पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदींवर टीका केली होती. या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा विरोधकांना अश्लिल भाषेचा वापर करत धमक्या दिल्या जातात असा आरोप विरोधकांनी केला होता. 

अमित मालविया यांनी यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे बोट दाखवत त्यांच्या फॉलोअर्सकडून होणा-या अश्लिल भाषेचा वापर आणि धमक्यांबद्दल कोणी बोलत नसल्याचं सांगितलं. 'हा वाद फक्त हास्यास्पद आणि खोटा नाही, तर निवडक लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराचं प्रदर्शन आहे', असं अमित मालविया बोलले आहेत. 

यावेळा त्यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांसोबत मिसळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ख-या अर्थाने विश्वास असणारे मोदी दुर्मिळ नेते आहेत. त्यांनी ट्विटरवर कधीच कोणाला अनफॉलो केलेलं नाही'. याआधी पीएमओ हॅण्डलवरुन अनेकांना अनफॉलो करण्यात आलं होतं, पण मोदींनी तसं केलं नाही असं अमित मालविया यांनी सांगितलं आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनाही ट्विटरवर फॉलो करतात ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत. राहुल गांधींवर धोखाधडी केल्याचा आरोप आहे, तर अरविंद केजरीवाल वारंवार मोदींवर टिप्पणी करत असतात', असंही अमित मालविया बोलले आहेत. 

काँग्रेसने मात्र अमित मालविया यांच्या स्टेटमेंटमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलं आहे. पक्षाचा आणि भाजपा सरकारचा काय अजेंडा आहे हे लोकांना कळलं असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर आरएसएसने आनंद साजरा करत मिठाई वाटली होती, ज्यामुळे सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती याची आठवण मोदींना आणि भाजपाला काँग्रेसने करुन दिली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशBJPभाजपा