शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला ट्विटरवर फॉलो करणे हे त्याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट नाही - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:56 IST

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं

नवी दिल्ली, दि. 8 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान भाजपाने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू मांडली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला फॉलो करणे हे त्या व्यक्तीचं चारित्र्य प्रमाणपत्र नाही. त्याचप्रमाणे ती व्यक्ती कसं वागेल याची ती गॅरंटीही नाही' असं भाजपाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालविया बोलले आहेत. हा वाद अयोग्य असल्याचंही ते बोलले आहेत. 

देशातील वातावरण बिघडवण्याचं काम करणा-या अनेकांना पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदींवर टीका केली होती. या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा विरोधकांना अश्लिल भाषेचा वापर करत धमक्या दिल्या जातात असा आरोप विरोधकांनी केला होता. 

अमित मालविया यांनी यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे बोट दाखवत त्यांच्या फॉलोअर्सकडून होणा-या अश्लिल भाषेचा वापर आणि धमक्यांबद्दल कोणी बोलत नसल्याचं सांगितलं. 'हा वाद फक्त हास्यास्पद आणि खोटा नाही, तर निवडक लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराचं प्रदर्शन आहे', असं अमित मालविया बोलले आहेत. 

यावेळा त्यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांसोबत मिसळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ख-या अर्थाने विश्वास असणारे मोदी दुर्मिळ नेते आहेत. त्यांनी ट्विटरवर कधीच कोणाला अनफॉलो केलेलं नाही'. याआधी पीएमओ हॅण्डलवरुन अनेकांना अनफॉलो करण्यात आलं होतं, पण मोदींनी तसं केलं नाही असं अमित मालविया यांनी सांगितलं आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनाही ट्विटरवर फॉलो करतात ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत. राहुल गांधींवर धोखाधडी केल्याचा आरोप आहे, तर अरविंद केजरीवाल वारंवार मोदींवर टिप्पणी करत असतात', असंही अमित मालविया बोलले आहेत. 

काँग्रेसने मात्र अमित मालविया यांच्या स्टेटमेंटमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलं आहे. पक्षाचा आणि भाजपा सरकारचा काय अजेंडा आहे हे लोकांना कळलं असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर आरएसएसने आनंद साजरा करत मिठाई वाटली होती, ज्यामुळे सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती याची आठवण मोदींना आणि भाजपाला काँग्रेसने करुन दिली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशBJPभाजपा