शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला ट्विटरवर फॉलो करणे हे त्याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट नाही - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 08:56 IST

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं

नवी दिल्ली, दि. 8 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान भाजपाने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू मांडली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला फॉलो करणे हे त्या व्यक्तीचं चारित्र्य प्रमाणपत्र नाही. त्याचप्रमाणे ती व्यक्ती कसं वागेल याची ती गॅरंटीही नाही' असं भाजपाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालविया बोलले आहेत. हा वाद अयोग्य असल्याचंही ते बोलले आहेत. 

देशातील वातावरण बिघडवण्याचं काम करणा-या अनेकांना पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदींवर टीका केली होती. या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा विरोधकांना अश्लिल भाषेचा वापर करत धमक्या दिल्या जातात असा आरोप विरोधकांनी केला होता. 

अमित मालविया यांनी यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे बोट दाखवत त्यांच्या फॉलोअर्सकडून होणा-या अश्लिल भाषेचा वापर आणि धमक्यांबद्दल कोणी बोलत नसल्याचं सांगितलं. 'हा वाद फक्त हास्यास्पद आणि खोटा नाही, तर निवडक लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराचं प्रदर्शन आहे', असं अमित मालविया बोलले आहेत. 

यावेळा त्यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांसोबत मिसळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ख-या अर्थाने विश्वास असणारे मोदी दुर्मिळ नेते आहेत. त्यांनी ट्विटरवर कधीच कोणाला अनफॉलो केलेलं नाही'. याआधी पीएमओ हॅण्डलवरुन अनेकांना अनफॉलो करण्यात आलं होतं, पण मोदींनी तसं केलं नाही असं अमित मालविया यांनी सांगितलं आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनाही ट्विटरवर फॉलो करतात ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत. राहुल गांधींवर धोखाधडी केल्याचा आरोप आहे, तर अरविंद केजरीवाल वारंवार मोदींवर टिप्पणी करत असतात', असंही अमित मालविया बोलले आहेत. 

काँग्रेसने मात्र अमित मालविया यांच्या स्टेटमेंटमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलं आहे. पक्षाचा आणि भाजपा सरकारचा काय अजेंडा आहे हे लोकांना कळलं असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर आरएसएसने आनंद साजरा करत मिठाई वाटली होती, ज्यामुळे सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती याची आठवण मोदींना आणि भाजपाला काँग्रेसने करुन दिली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशBJPभाजपा