शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'भारत माता की जय' घोषणेने 'दीदी' होतात नाराज; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 18:25 IST

पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जी सरकारवर निशाणाविकासाची गती कायम राखण्यात बंगाल अपयशी - पंतप्रधानतृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींनी डागली तोफ

कोलकाता :पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे काही प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (prime minister narendra modi attacks on mamata banerjee in haldia west bengal)

हल्दिया येथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतासह संपूर्ण देशाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या बंगालच्या भूमिला साष्टांग नमस्कार करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनानिमित्त बंगालमध्ये आलो होतो. आता पश्चिम बंगालच्या विकासात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

भारत माता की जय घोषणेचा ममता दीदींना राग

सरकारकडे आपले अधिकार, हक्क यांची मागणी केली की, ममता दीदी नाराज होतात. भारत माता की जय या घोषणेचाही ममता दीदींना राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. कोलकाता येथे साडे आठ हजार कोटी अपेक्षित खर्च असणारा प्रकल्प सुरू होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आमचा चहा बदनाम करण्यासाठी परदेशात कट; टुलकिट खुलाशावर पंतप्रधानांचा हल्लाबोल

विकासाची गती राखण्यात बंगाल मागे

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत अनेक पटीने पुढे होते. बंगालमध्ये पायाभूत सुविधा उत्तम होत्या. नोकऱ्यांच्या अनेकविध संधी होत्या. भारतासह संपूर्ण जगाचे मार्गदर्शन करणाऱ्या बंगालला आजही मोठा सन्मान प्राप्त होतो. असे सर्व असताना विकासाची गती कायम ठेवण्यात बंगाल मागे का राहिला, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली. 

विकासाचे राजकारण नाही

पश्चिम बंगालमधील आजच्या स्थितीचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथे विकासाचे राजकारण झाले नाही. काँग्रेस कार्यकाळात येथे भ्रष्टाचार होता. डाव्या पक्षांच्या काळातही भ्रष्टाचार फोफावला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी परिवर्तनाचे आश्वासन दिले. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. ममता बॅनर्जी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, गेल्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही, हेच आजच्या घडीला स्पष्ट होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका