शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

'भारत माता की जय' घोषणेने 'दीदी' होतात नाराज; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 18:25 IST

पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जी सरकारवर निशाणाविकासाची गती कायम राखण्यात बंगाल अपयशी - पंतप्रधानतृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदींनी डागली तोफ

कोलकाता :पश्चिम बंगाल विकासाची गती कायम राखण्यात कमी पडला, असे सांगत भारत माता की जय या घोषणेने ममता दीदींना एवढा राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे काही प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (prime minister narendra modi attacks on mamata banerjee in haldia west bengal)

हल्दिया येथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतासह संपूर्ण देशाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या बंगालच्या भूमिला साष्टांग नमस्कार करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनानिमित्त बंगालमध्ये आलो होतो. आता पश्चिम बंगालच्या विकासात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

भारत माता की जय घोषणेचा ममता दीदींना राग

सरकारकडे आपले अधिकार, हक्क यांची मागणी केली की, ममता दीदी नाराज होतात. भारत माता की जय या घोषणेचाही ममता दीदींना राग का येतो, असा तिखट सवाल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. कोलकाता येथे साडे आठ हजार कोटी अपेक्षित खर्च असणारा प्रकल्प सुरू होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आमचा चहा बदनाम करण्यासाठी परदेशात कट; टुलकिट खुलाशावर पंतप्रधानांचा हल्लाबोल

विकासाची गती राखण्यात बंगाल मागे

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत अनेक पटीने पुढे होते. बंगालमध्ये पायाभूत सुविधा उत्तम होत्या. नोकऱ्यांच्या अनेकविध संधी होत्या. भारतासह संपूर्ण जगाचे मार्गदर्शन करणाऱ्या बंगालला आजही मोठा सन्मान प्राप्त होतो. असे सर्व असताना विकासाची गती कायम ठेवण्यात बंगाल मागे का राहिला, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली. 

विकासाचे राजकारण नाही

पश्चिम बंगालमधील आजच्या स्थितीचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथे विकासाचे राजकारण झाले नाही. काँग्रेस कार्यकाळात येथे भ्रष्टाचार होता. डाव्या पक्षांच्या काळातही भ्रष्टाचार फोफावला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी परिवर्तनाचे आश्वासन दिले. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. ममता बॅनर्जी यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, गेल्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही, हेच आजच्या घडीला स्पष्ट होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका