शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

"पंतप्रधान मोदी बोलताहेत चीनची भाषा" गंभीर आरोप करत काँग्रेसने डागले पाच सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 21:51 IST

लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले होतेअनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. त्यात भारताच्या भूभागावर झालेली चिनी घुसखोरी यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही तापले आहे. लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवाच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे. 

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले. हीच भाषा चीनही बोलत आहे आम्ही भारताच्या कुठल्याही भागात घुसखोरी केली नसल्याचे सांगत आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. 

अनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे. यादरम्यान, देशाच्या भूमीचे रक्षण करताना कर्नल संतोष बाबूंसह २० जवान धारातीर्थी पडले. तर ८५ जण जखमी झाले. याशिवाय १० जवानांना चीनने पकडले होते. आता मोदी सांगत आहेत की चिनी सैनिकांनी घुसखोरी केलेली नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. 

यावेळी कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाच सवालही डागले. ते पुढीलप्रमाणे

१) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य म्हणजे गलवान खोऱ्यातून चीनला हाकलवण्यासाठी गेलेल्या कर्नल संतोष बाबू आणि अन्य १९ जवानांच्या वीरतेचा आणि बलिदानाचा अवमान नव्हे काय?

२) चीनने गलवान खोऱ्यावर कधी दावा केला नव्हता? चीन आता गलवान खोऱ्यात घुसखोरी केली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे? 

३) संरक्षण तज्ज्ञ, लष्करी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंच्या माध्यमातून चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. मग सरकार ही बाब का नाकारत आहे. 

४) सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी आमच्या भूभागावर कुणीही घुसखोरी केली नसल्याचे सांगितले. मात्र नंतर पीएमओने आपल्या अधिकृत वक्तव्यातून हे विधान का हटवले. जर आमच्या क्षेत्रात कुणी घुसखोरी केली नसेल तर आमचे २० जवान कसे शहीद झाले? 

५) गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या बांधकामाबाबत संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेले दावे पंतप्रधान मोदी का खोडून काढत आहेत? 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसPoliticsराजकारण