शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

"पंतप्रधान मोदी बोलताहेत चीनची भाषा" गंभीर आरोप करत काँग्रेसने डागले पाच सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 21:51 IST

लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले होतेअनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. त्यात भारताच्या भूभागावर झालेली चिनी घुसखोरी यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही तापले आहे. लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवाच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे. 

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले. हीच भाषा चीनही बोलत आहे आम्ही भारताच्या कुठल्याही भागात घुसखोरी केली नसल्याचे सांगत आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. 

अनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे. यादरम्यान, देशाच्या भूमीचे रक्षण करताना कर्नल संतोष बाबूंसह २० जवान धारातीर्थी पडले. तर ८५ जण जखमी झाले. याशिवाय १० जवानांना चीनने पकडले होते. आता मोदी सांगत आहेत की चिनी सैनिकांनी घुसखोरी केलेली नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. 

यावेळी कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाच सवालही डागले. ते पुढीलप्रमाणे

१) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य म्हणजे गलवान खोऱ्यातून चीनला हाकलवण्यासाठी गेलेल्या कर्नल संतोष बाबू आणि अन्य १९ जवानांच्या वीरतेचा आणि बलिदानाचा अवमान नव्हे काय?

२) चीनने गलवान खोऱ्यावर कधी दावा केला नव्हता? चीन आता गलवान खोऱ्यात घुसखोरी केली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे? 

३) संरक्षण तज्ज्ञ, लष्करी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंच्या माध्यमातून चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. मग सरकार ही बाब का नाकारत आहे. 

४) सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी आमच्या भूभागावर कुणीही घुसखोरी केली नसल्याचे सांगितले. मात्र नंतर पीएमओने आपल्या अधिकृत वक्तव्यातून हे विधान का हटवले. जर आमच्या क्षेत्रात कुणी घुसखोरी केली नसेल तर आमचे २० जवान कसे शहीद झाले? 

५) गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या बांधकामाबाबत संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेले दावे पंतप्रधान मोदी का खोडून काढत आहेत? 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसPoliticsराजकारण