शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी माझ्या पुढच्या भाषणाला घाबरले; राहुल गांधींचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 15:53 IST

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अदानींचा मुद्दा उपस्थित केला...

लोकसभेचे सदस्यत्व अर्थात खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. लकसभा सदस्यत्व रद्द झाल्यापासून सुमारे 24 तासांनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लक्ष्य केले. या दरम्यान, त्यांनी अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. माफी मागण्याच्या मुद्द्यावर राहुल म्हणाले, "माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे." गांधी कुणालाही माफी मागत नाहीत.

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अदानींचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. अदानी यांचा नरेंद्र मोदींशी काय संबंध आहे? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझे सदस्यत्व रद्द करून, धमकावून, मला तुरूंगात बंद केले जाऊ शकते. तर मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहणार.'

राहुल म्हणाले, 'मी संसदेत आहे की संसदेच्या बाहेर, मला फरक पडत नाही. त्यांनी मला मारहाण केली किंवा तुरूंगात टाकले, तरी मी माझे काम करतच राहणार. पंतप्रधानांना एका साध्या प्रश्नापासून वाचविण्यासाठी हे संपूर्ण नाट्य करण्यात आले आहे. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपये कुणाचे गेले? मी या धमक्या, अपात्रता अथवा तुरूंगात जाण्यास भीत नाही. 'पंतप्रधानांना माझ्या पुढच्या भाषणाची भीती' -काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'मी अनेक वेळा बोललो आहे की, भारतात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची नव-नवीन उदाहरणेही रोज बघायला मिळत आहेत. मी संसदेत पुरावे दिले, अदानी आणि PM मोदी यांच्या नात्यासंदर्भात बोललो. अदानी यांना नियमांत बदल करून एअरपोर्ट दिले गेले. या संदर्भात मी संसदेत बोललो. पंतप्रधान माझ्या पुढील भाषणाला घाबरले. यामुळेच मला अपात्र ठरवण्यात आले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGautam Adaniगौतम अदानीNarendra Modiनरेंद्र मोदी