शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

खुद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली बस परत धावलीच नाही...हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 4:30 PM

11 मे रोजी मोदी यांनी नेपाळच्या जनकपूर ते अयोध्या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला होता. या दोन्ही बसेस काठमांडूमध्ये धुळ खात उभ्या केलेल्या आहेत.

मधुबनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनांची सुरुवात करतात खरी परंतू त्यापैकी किती योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात याबाबत शंकाच आहे. 11 मे रोजी मोदी यांनी नेपाळच्या जनकपूर ते अयोध्या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला होता. मात्र, या बसेस पहिल्या दिवशी रवाना झाल्या त्या पुन्हा कधी धावल्याच नाहीत. या दोन्ही बसेस काठमांडूमध्ये धुळ खात उभ्या केलेल्या आहेत. मोदी यांनी बेकायदेशीररित्या या बसना हिरवा झेंडा दाखविल्याचे आता उघड होत आहे. 

एका वृत्तसंस्थेने केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघड झाली आहे. दोन्ही देशांचे अधिकाऱ्यांना 11 मे रोजीच माहिती होते की, या बस आजपासून कधी चालवायच्याच नाहीत. तरीही दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या हस्ते या बस रवाना करण्यात आल्या होत्या.

 धक्कादायक म्हणजे, या बसमधून जाणारे यात्रेकरू दाखविण्यासाठी आदल्या दिवशी नेते आणि अधिकाऱ्यांच्या ओळखीच्या लोकांना गोळा करण्यात आले. यापैकी बऱ्याचजनांना तर 9, 10 मे रोजी फोन करून सांगण्यात आले. तसेच त्यांना सांगण्य़ात आले की अयोध्येला जायचे आहे, राहण्याची-जेवणाची सुविधा मोफत आहे. यामुळे हे लोकही अयोध्ये वारीला तयार झाले. 

काठमांडूमध्ये धूळ खात उभ्या आहेत दोन्ही बसया बस दोन्ही देशांदरम्यान चालविण्यासाठी लागणारा करारही करण्यात आला नव्हता. याबाबत माहीती असूनही बस त्यादिवशी भारतात पाठविण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी महिन्याभरानंतर बससेवा नियमित सुरु करण्यात येईल. मात्र, चार महिन्यांनंतरही या बस काठमांडूमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या बस खासगी आहेत. बसचे मालक दीपक थापा यांना या मार्गावर बस चालविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर, अयोध्या ते जनकपूर चाललेली बस ही गंगोत्री ट्रॅव्हल्सची होती. ती आता तिच्या जुन्या मार्गावरच चालू आहे. 

 

एमओयू पुन्हा झालाच नाही...पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या बससेवेचा करारच झाला नव्हता. आधी 2014 मध्ये अयोध्या आणि जनकपूर धाम या शहरांच्या महापौरांमध्ये करार झाला होता. पण तो 2017 मध्येच संपला होता. नवीन करार न करताच मोदी यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. नवीन करार अद्याप व्हायचा आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळAyodhyaअयोध्याJanakpurजनकपूर