शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली बस परत धावलीच नाही...हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 16:31 IST

11 मे रोजी मोदी यांनी नेपाळच्या जनकपूर ते अयोध्या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला होता. या दोन्ही बसेस काठमांडूमध्ये धुळ खात उभ्या केलेल्या आहेत.

मधुबनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनांची सुरुवात करतात खरी परंतू त्यापैकी किती योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात याबाबत शंकाच आहे. 11 मे रोजी मोदी यांनी नेपाळच्या जनकपूर ते अयोध्या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला होता. मात्र, या बसेस पहिल्या दिवशी रवाना झाल्या त्या पुन्हा कधी धावल्याच नाहीत. या दोन्ही बसेस काठमांडूमध्ये धुळ खात उभ्या केलेल्या आहेत. मोदी यांनी बेकायदेशीररित्या या बसना हिरवा झेंडा दाखविल्याचे आता उघड होत आहे. 

एका वृत्तसंस्थेने केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघड झाली आहे. दोन्ही देशांचे अधिकाऱ्यांना 11 मे रोजीच माहिती होते की, या बस आजपासून कधी चालवायच्याच नाहीत. तरीही दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या हस्ते या बस रवाना करण्यात आल्या होत्या.

 धक्कादायक म्हणजे, या बसमधून जाणारे यात्रेकरू दाखविण्यासाठी आदल्या दिवशी नेते आणि अधिकाऱ्यांच्या ओळखीच्या लोकांना गोळा करण्यात आले. यापैकी बऱ्याचजनांना तर 9, 10 मे रोजी फोन करून सांगण्यात आले. तसेच त्यांना सांगण्य़ात आले की अयोध्येला जायचे आहे, राहण्याची-जेवणाची सुविधा मोफत आहे. यामुळे हे लोकही अयोध्ये वारीला तयार झाले. 

काठमांडूमध्ये धूळ खात उभ्या आहेत दोन्ही बसया बस दोन्ही देशांदरम्यान चालविण्यासाठी लागणारा करारही करण्यात आला नव्हता. याबाबत माहीती असूनही बस त्यादिवशी भारतात पाठविण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी महिन्याभरानंतर बससेवा नियमित सुरु करण्यात येईल. मात्र, चार महिन्यांनंतरही या बस काठमांडूमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या बस खासगी आहेत. बसचे मालक दीपक थापा यांना या मार्गावर बस चालविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर, अयोध्या ते जनकपूर चाललेली बस ही गंगोत्री ट्रॅव्हल्सची होती. ती आता तिच्या जुन्या मार्गावरच चालू आहे. 

 

एमओयू पुन्हा झालाच नाही...पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या बससेवेचा करारच झाला नव्हता. आधी 2014 मध्ये अयोध्या आणि जनकपूर धाम या शहरांच्या महापौरांमध्ये करार झाला होता. पण तो 2017 मध्येच संपला होता. नवीन करार न करताच मोदी यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. नवीन करार अद्याप व्हायचा आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळAyodhyaअयोध्याJanakpurजनकपूर