शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रतिबंधात्मक अटकेवेळी तारतम्य ठेवायलाच हवे, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 08:46 IST

तेलंगना पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाशी संबंधित प्रकरणात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने हा निर्णय दिला.

नवी दिल्ली : प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आरोपीस करण्यात येणारी अटक ही आत्यंतिक कठोर उपाययोजना असून, तिचा तारतम्यानेच वापर व्हायला हवा. तिचा मनमानी पद्धतीने तसेच सर्रास वापर होत असेल, तर ही कारवाई सुरुवातीलाच रोखली जायला हवी, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

तेलंगना पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाशी संबंधित प्रकरणात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने हा निर्णय दिला. न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा हे न्यायपीठाचे अन्य सदस्य आहेत. न्यायालयाने म्हटले की, अटकेवेळी लक्षात घेतले पाहिजे की, यात आरोपीने गुन्हा केलेला नसतो. गुन्हा करू नये, म्हणून ही कारवाई असते. कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना  आलेले अपयश या अटकेचे कारण ठरता कामा नये. 

आधी काय घडले होते?या प्रकरणातील याचिकाकर्त्यास गेल्या वर्षी १२ सप्टेंबर रोजी तेलंगनातील राचाकोंडा पोलिस आयुक्तांनी ‘तेलंगना घातक कारवाया प्रतिबंधक कायदा १९८६’ अन्वये अटक केली होती. याविरुद्धची आरोपीची याचिका उच्च न्यायालयाने ४ दिवसांनी फेटाळली  लावली होती. त्याविरुद्ध आरोपीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने तेलंगना उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करीत पोलिस आयुक्तांनी काढलेला प्रतिबंधात्मक अटकेचा आदेश रद्द केला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय