शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 19:54 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कार्यरत एका विभागाचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्यावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत.

उत्तर प्रदेशमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कार्यरत एका विभागाचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्यावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. अरुण कुमार यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला आहे. सुंदर तरुणींनी इथे थांबावं, बाकीच्यांनी बीए, बीएससी करावं किंवा घरी जावं, असा सल्ला अरुण कुमार यांनी दिल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला. त्यानंतर संतप्त विद्यार्थिनींसह एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. प्रकरण वाढताच शिक्षण मंत्री आशिष पटेल यांनी अरुण कुमार यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. 

ही घटना मेरठमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडली आहे. येथे शिक्षण घेत असलेल्या ७८ विद्यार्थिनी एकाचवेळी नापास झाल्या होत्या. बहुतांश विद्यार्थिनींना शून्य किंवा त्याच्या आसपाचेच गुण मिळाले होते. हा निकाल पाहून अनेक विद्यार्थिनींना धक्का बसला होता. कमी गुण मिळाले असते तरी चाललं असतं मात्र बहुतांश विद्यार्थिनींना जाणीवपूर्णक शून्य गुण देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.  

दरम्यान, एचओडी अरुण कुमार यांना काही आक्षेपार्ह टिप्पण्यादेखील केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. सुंदर मुलींनी येथे थांबावं बाकीच्यांना बीएससी करावं,असे अरुण सिंह यांनी सांगितल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला. त्यावरून कॉलेजमध्ये वादाला तोंड फुटलं होतं. तसेच विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं. तसेच दोषी शिक्षकाला हटवण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी तांत्रिक शिक्षणमंत्री आशिष पटेल यांनी अरुण कुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय