शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या काळात न्यायव्यवस्थेवर दबाव? सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:44 IST

DY Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निवडणूक आयोगाबाबत दिलेला निकाल हे त्याचं उदाहरण आहे, असं स्पष्टपणे सांगितलं.

सध्या सुरू असलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी भारतातील न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण अशा विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निवडणूक आयोगाबाबत दिलेला निकाल हे त्याचं उदाहरण आहे, असं स्पष्टपणे सांगितलं.

यावेळी कोर्टात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा उल्लेख करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं की, आमच्याकडे प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी आहे. तसेच ही संख्या लोकांचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वासही दर्शवते. यावेळी सरन्यायाधीशांनी जिल्हा न्यायपालिकेमध्ये पायाभूत चौकटीची कमतरता असून, त्यात सुधारणेची गरज आहे, असे सांगितले.

न्यायव्यवस्थेवरील दबावाबाबतच्या प्रश्नाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की,  माझ्या २३ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये कुणीही मला कुठल्याही खटल्याचा निकाल कसा द्यावा, याबाबत सांगितलेलं नाही. यावेळी कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना मी कायदेमंत्र्यांसोबत कुठल्याही मुद्द्यामध्ये अडकू इच्छित नाही, आमच्या मतांमध्ये अंतर आहे,  असे त्यांनी सांगितले.  हमारी धारणाओं में अंतर है. दरम्यान, सरकारकडून न्यायव्यवस्थेवर कुठलाही डबाव नाही आहे. नुकताच निवडणूक आयुक्तांबाबत दिलेला निर्णय हे त्याचं उदाहर आहे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्थेला आणखी आधुनिक बनवण्याची गरज आहे. आमचं मॉडेल हे ब्रिटिशांकडून मिळालेल्या वसाहतवादी मॉडेलवर आधारित आहे. पुढच्या ५०-७५ वर्षांमध्ये आपल्याला भारतीय न्यायव्यवस्थेला आधुनिक तंत्राने समृद्ध केलं पाहिजे. कोरोनाच्या साथीच्या काळात आपण व्हिडीओ कॉन्फ्रन्स प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे काम केलं, ते जगाच्या कुठल्याही भागासाठी अभूतपूर्व आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत