शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

काँग्रेस कार्यसमितीच्या निवडणुकीसाठी दबाव; निवडणूक घेऊ इच्छितात काही नेते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 10:37 IST

उदयपूर येथील चिंतन शिबिरात काँग्रेसने ५० टक्के पदे ही ५० वर्षांआतील नेत्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे.

आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेसचे काही नेते आतापर्यंत दबक्या आवाजात काँग्रेस कार्यसमितीची निवडणूक घेण्याची मागणी करत होते. आता माजी अर्थमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मागणी केली आहे की, रायपूर अधिवेशनात कार्यसमितीची निवडणूक घ्यावी, अशी थेट मागणी करणारे चिदंबरम हे पहिले नेते आहेत. अर्थात, हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक झाली तर ११ पदांसाठी मतदान होऊ शकते. १२ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. 

तरुणांना संधी द्या : चिदंबरम पी. चिदंबरम यांनी सांगितले की, माझी काही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. मला वाटते की, कार्यसमितीत तरुणांना संधी द्यायला हवी. उदयपूर येथील चिंतन शिबिरात काँग्रेसने ५० टक्के पदे ही ५० वर्षांआतील नेत्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. पक्षाने काँग्रेसच्या सर्व सदस्यांची यादी जारी केली आहे. हे सदस्य निवडणूक झाल्यास कार्यसमितीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. 

छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे काँग्रेस नेत्यांवर छापेइडीने सोमवारी छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संबंध असलेल्या परिसरांचा समावेश आहे. कोळसा आकारणी प्रकरणाच्या (मनी लॉन्ड्रिंग) चालू तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्याची राजधानी रायपूरमध्ये २४-२६ फेब्रुवारी दरम्यान काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय पूर्ण अधिवेशनाच्या काही दिवस आधी हे छापे पडले आहेत. राज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सत्ता आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भिलाई (दुर्ग जिल्हा) येथील आमदार देवेंद्र यादव, छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार रामगोपाल अग्रवाल, छत्तीसगड स्टेट बिल्डिंग आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुशील सनी अग्रवाल, रायपूरमध्ये पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आर.पी.सिंग यांचा समावेश असलेल्या डझनभर ठिकाणी सोमवारी पहाटेपासून शोध सुरू आहे. 

‘अमृत काळ नव्हे ही अघोषित आणीबाणी’ईडीने सोमवारी छत्तीसगडमध्ये पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकल्यानंतर काँग्रेसने सरकारची निंदा केली ही कारवाई म्हणजे सूड, सूडबुद्धी आणि छळाचे तृतीय दर्जाचे राजकारणाचे उदाहरण आहे, अशा डावपेचांनी आम्ही घाबरणार नाही, हा ‘अमृत काळ’ नसून “अघोषित आणीबाणी” आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ईडीला त्यांनी “लोकशाहीचा कर्दनकाळ” असे संबोधले.

टॅग्स :congressकाँग्रेस