शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यसमितीच्या निवडणुकीसाठी दबाव; निवडणूक घेऊ इच्छितात काही नेते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 10:37 IST

उदयपूर येथील चिंतन शिबिरात काँग्रेसने ५० टक्के पदे ही ५० वर्षांआतील नेत्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे.

आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेसचे काही नेते आतापर्यंत दबक्या आवाजात काँग्रेस कार्यसमितीची निवडणूक घेण्याची मागणी करत होते. आता माजी अर्थमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मागणी केली आहे की, रायपूर अधिवेशनात कार्यसमितीची निवडणूक घ्यावी, अशी थेट मागणी करणारे चिदंबरम हे पहिले नेते आहेत. अर्थात, हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक झाली तर ११ पदांसाठी मतदान होऊ शकते. १२ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. 

तरुणांना संधी द्या : चिदंबरम पी. चिदंबरम यांनी सांगितले की, माझी काही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. मला वाटते की, कार्यसमितीत तरुणांना संधी द्यायला हवी. उदयपूर येथील चिंतन शिबिरात काँग्रेसने ५० टक्के पदे ही ५० वर्षांआतील नेत्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. पक्षाने काँग्रेसच्या सर्व सदस्यांची यादी जारी केली आहे. हे सदस्य निवडणूक झाल्यास कार्यसमितीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. 

छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे काँग्रेस नेत्यांवर छापेइडीने सोमवारी छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संबंध असलेल्या परिसरांचा समावेश आहे. कोळसा आकारणी प्रकरणाच्या (मनी लॉन्ड्रिंग) चालू तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्याची राजधानी रायपूरमध्ये २४-२६ फेब्रुवारी दरम्यान काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय पूर्ण अधिवेशनाच्या काही दिवस आधी हे छापे पडले आहेत. राज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सत्ता आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भिलाई (दुर्ग जिल्हा) येथील आमदार देवेंद्र यादव, छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार रामगोपाल अग्रवाल, छत्तीसगड स्टेट बिल्डिंग आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुशील सनी अग्रवाल, रायपूरमध्ये पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आर.पी.सिंग यांचा समावेश असलेल्या डझनभर ठिकाणी सोमवारी पहाटेपासून शोध सुरू आहे. 

‘अमृत काळ नव्हे ही अघोषित आणीबाणी’ईडीने सोमवारी छत्तीसगडमध्ये पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकल्यानंतर काँग्रेसने सरकारची निंदा केली ही कारवाई म्हणजे सूड, सूडबुद्धी आणि छळाचे तृतीय दर्जाचे राजकारणाचे उदाहरण आहे, अशा डावपेचांनी आम्ही घाबरणार नाही, हा ‘अमृत काळ’ नसून “अघोषित आणीबाणी” आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ईडीला त्यांनी “लोकशाहीचा कर्दनकाळ” असे संबोधले.

टॅग्स :congressकाँग्रेस