शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यसमितीच्या निवडणुकीसाठी दबाव; निवडणूक घेऊ इच्छितात काही नेते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 10:37 IST

उदयपूर येथील चिंतन शिबिरात काँग्रेसने ५० टक्के पदे ही ५० वर्षांआतील नेत्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे.

आदेश रावल

नवी दिल्ली : काँग्रेसचे काही नेते आतापर्यंत दबक्या आवाजात काँग्रेस कार्यसमितीची निवडणूक घेण्याची मागणी करत होते. आता माजी अर्थमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मागणी केली आहे की, रायपूर अधिवेशनात कार्यसमितीची निवडणूक घ्यावी, अशी थेट मागणी करणारे चिदंबरम हे पहिले नेते आहेत. अर्थात, हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक झाली तर ११ पदांसाठी मतदान होऊ शकते. १२ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. 

तरुणांना संधी द्या : चिदंबरम पी. चिदंबरम यांनी सांगितले की, माझी काही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. मला वाटते की, कार्यसमितीत तरुणांना संधी द्यायला हवी. उदयपूर येथील चिंतन शिबिरात काँग्रेसने ५० टक्के पदे ही ५० वर्षांआतील नेत्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. पक्षाने काँग्रेसच्या सर्व सदस्यांची यादी जारी केली आहे. हे सदस्य निवडणूक झाल्यास कार्यसमितीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. 

छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे काँग्रेस नेत्यांवर छापेइडीने सोमवारी छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संबंध असलेल्या परिसरांचा समावेश आहे. कोळसा आकारणी प्रकरणाच्या (मनी लॉन्ड्रिंग) चालू तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्याची राजधानी रायपूरमध्ये २४-२६ फेब्रुवारी दरम्यान काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय पूर्ण अधिवेशनाच्या काही दिवस आधी हे छापे पडले आहेत. राज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सत्ता आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भिलाई (दुर्ग जिल्हा) येथील आमदार देवेंद्र यादव, छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार रामगोपाल अग्रवाल, छत्तीसगड स्टेट बिल्डिंग आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुशील सनी अग्रवाल, रायपूरमध्ये पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आर.पी.सिंग यांचा समावेश असलेल्या डझनभर ठिकाणी सोमवारी पहाटेपासून शोध सुरू आहे. 

‘अमृत काळ नव्हे ही अघोषित आणीबाणी’ईडीने सोमवारी छत्तीसगडमध्ये पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकल्यानंतर काँग्रेसने सरकारची निंदा केली ही कारवाई म्हणजे सूड, सूडबुद्धी आणि छळाचे तृतीय दर्जाचे राजकारणाचे उदाहरण आहे, अशा डावपेचांनी आम्ही घाबरणार नाही, हा ‘अमृत काळ’ नसून “अघोषित आणीबाणी” आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ईडीला त्यांनी “लोकशाहीचा कर्दनकाळ” असे संबोधले.

टॅग्स :congressकाँग्रेस