मराठा समाजाची बदनामी थांबवा पत्रकार परिषद: अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा इशारा
By Admin | Updated: May 9, 2014 00:54 IST2014-05-08T21:17:02+5:302014-05-09T00:54:17+5:30
अहमदनगर: खर्डा येथील नितीन आगे हत्याप्रकरणी मराठा समाजाची सुरू असलेली बदनामी थांबविण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा शिवक्रांती युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष संजय सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला़

मराठा समाजाची बदनामी थांबवा पत्रकार परिषद: अखिल भारतीय मराठा सेवा संघाचा इशारा
अहमदनगर: खर्डा येथील नितीन आगे हत्याप्रकरणी मराठा समाजाची सुरू असलेली बदनामी थांबविण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा शिवक्रांती युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष संजय सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला़
पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कल्हापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज थोरात, जिल्हा संघटक जगताप आदी उपस्थित होते़ याविषयी माहिती देताना सावंत म्हणाले, खर्डा येथील प्रकार अत्यंत निंदनीय आहे़या घटनेचा समाजासह सर्वांनी निषेध केला आहे़आरोपींची पाठराखण करण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही़ दोन कुटुंबातील वादातून ही घटना घडली आहे़ परंतु या घटनेला मराठा समाज जबाबदार असल्याचे चित्र रंगविले जात आहे़मराठा समाजावर जाणीवपूर्वक आरोप केले जात आहेत. चिखलफेक केली जात आहे़जिल्ह्यातील मराठा समाजातील मंत्री, कार्यकर्ते आणि खर्डा येथील मराठा समाजावर आरोप केले जात आहे़ मराठा समाजातील नेत्यांनी एकतेला प्राधान्य दिले आहे़ ही घटना दुर्दैवी आहे़ मात्र याचा आधार घेऊन सामाजिक ऐक्यास तडा देण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे़मराठा समाजावर होणारा अन्याय प्रशासनाने थांबवावा,अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन हाती घेण्यात येईल,असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला़