शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 18:25 IST

Rahul Gandhi on Farmer Protest : नवीन कृषी कायद्यांमुळे देशातील कृषी बाजार समित्या संपुष्टात येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देआम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे देशात काळाबाजार वाढेल. या कायद्यांमुळे देशातील कृषी बाजार समित्या संपुष्टात येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी राहुल गांधी यांनी या कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लाल किल्ल्यावर जाण्यासाठी लोकांना परवानगी का देण्यात आली? त्यांना का थांबवले नाही? या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्र्यांनी द्यायला हवीत, असे राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. जर देशाचे पंतप्रधान शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकत नसतील तर आंदोलन आणखी मोठे होऊ शकते. आम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले की, "शेतकरी आंदोलनाबाबत काय सुरु आहे, ते तुम्हाला माहिती आहे. शेतकर्‍यांना मारहाण केली जात आहे. ते घाबरले आहेत. काय चालू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पहिला कायदा कृषी बाजार समिती रद्द करेल. दुसरा कायदा कृषी व्यवस्था संपवेल. यामुळे सर्वात मोठे उद्योगपती शक्य तितके धान्याची साठवणूक करू शकतात. तसेच, यामुळे शेतकरी मालाचा भावही ठरवू शकत नाही. तिसरा कायदा असा आहे की, शेतकरी यासंबंधीचे प्रकरण कोर्टात घेऊन जाऊ शकत नाही. हा पूर्णपणे क्रिमिनल अॅक्ट आहे. हे कायदे सरकारने मागे घ्यावेत आणि शेतकर्‍यांशी चर्चा करावी, असे आम्हाला वाटते."

याचबरोबर, राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे समजून घेऊन याला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "मला देशातील तरुणांना सांगायचे आहे की त्यांनी कायदा समजून घ्यावा. या कायद्यांमुळे देशाची बाजारपेठ व्यवस्था संपुष्टात येईल. शेतकर्‍यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. कोट्यावधी टन धान्य साठवणूक करण्यासाठी उद्योगपतींना खुली सूट देण्यात आली आहे. हे खूप धोकादायक आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी