शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 18:25 IST

Rahul Gandhi on Farmer Protest : नवीन कृषी कायद्यांमुळे देशातील कृषी बाजार समित्या संपुष्टात येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देआम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे देशात काळाबाजार वाढेल. या कायद्यांमुळे देशातील कृषी बाजार समित्या संपुष्टात येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी राहुल गांधी यांनी या कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लाल किल्ल्यावर जाण्यासाठी लोकांना परवानगी का देण्यात आली? त्यांना का थांबवले नाही? या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्र्यांनी द्यायला हवीत, असे राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. जर देशाचे पंतप्रधान शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकत नसतील तर आंदोलन आणखी मोठे होऊ शकते. आम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले की, "शेतकरी आंदोलनाबाबत काय सुरु आहे, ते तुम्हाला माहिती आहे. शेतकर्‍यांना मारहाण केली जात आहे. ते घाबरले आहेत. काय चालू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पहिला कायदा कृषी बाजार समिती रद्द करेल. दुसरा कायदा कृषी व्यवस्था संपवेल. यामुळे सर्वात मोठे उद्योगपती शक्य तितके धान्याची साठवणूक करू शकतात. तसेच, यामुळे शेतकरी मालाचा भावही ठरवू शकत नाही. तिसरा कायदा असा आहे की, शेतकरी यासंबंधीचे प्रकरण कोर्टात घेऊन जाऊ शकत नाही. हा पूर्णपणे क्रिमिनल अॅक्ट आहे. हे कायदे सरकारने मागे घ्यावेत आणि शेतकर्‍यांशी चर्चा करावी, असे आम्हाला वाटते."

याचबरोबर, राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे समजून घेऊन याला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "मला देशातील तरुणांना सांगायचे आहे की त्यांनी कायदा समजून घ्यावा. या कायद्यांमुळे देशाची बाजारपेठ व्यवस्था संपुष्टात येईल. शेतकर्‍यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. कोट्यावधी टन धान्य साठवणूक करण्यासाठी उद्योगपतींना खुली सूट देण्यात आली आहे. हे खूप धोकादायक आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी