शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राष्ट्रपती राजवट पुदुच्चेरीमध्ये लागू; पंतप्रधानांचा आज दौरा, काँग्रेसची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 00:43 IST

नारायणसामी यांचा राजीनामा राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता.

नवी दिल्ली : बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्री नारायणसामी यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर पुदुच्चेरीमध्ये बुधवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या केंद्रशासित प्रदेशात दोन महिन्यांतच निवडणुका होणार आहेत.

नारायणसामी यांचा राजीनामा राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता. तो राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने तिथे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या चार व द्रमुकच्या एका आमदाराने राजीनामा दिल्याने नारायणसामी सरकार अल्पमतात आले होते. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तामिळनाडूबरोबरच पुदुच्चेरीचाही दौरा करणार आहेत. तिथे ते काही योजनांचे भूमिपूजन व उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या मार्गात व कार्यक्रमांच्या ठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय काँग्रेसने केला आहे.  भाजपने कटकारस्थान रचून आणि आमदार फोडून निवडणुकीच्या दोन महिने आधी लोकनियुक्त सरकार पाडले, असा काँग्रेसचा आरोप  आहे.

भाजपने तसे केले नाही

पुदुच्चेरीमध्ये अण्णा द्रमुकच्या मदतीने भाजप सरकार स्थापन करणार, अशी चर्चा सुरू होती. तिथे भाजपचा एकही आमदार नाही. मात्र तीन राज्यपाल नियुक्त आमदार हे भाजपच्या बाजूचे आहेत. त्यामुळे ते आणि अण्णा द्रमुक यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, असे बोलले जात होते. मात्र भाजपने तसे केले नाही आणि राष्ट्रपती राजवटच लागू झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा