शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Budget 2019: 'पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेविरुद्ध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:23 IST

काँग्रेससह विरोधी पक्ष करणार तीव्र विरोध

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेच्या आगामी अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा सरकारचा मनसुबा असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष संसदेपासून ते थेट रस्त्यांवर उतरून जोरदार विरोध करण्याच्या तयारीत आहेत. मोदी सरकारचा कार्यकाळ मे २०१९ मध्ये संपत असताना लेखानुदानच सादर करता येऊ शकते, पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेचे उल्लंघन करणारे आहे. सरकारने असे केल्यास काँग्रेस, मित्र पक्षांसह विरोधी पक्षांनी सामायिक रणनीतीतहत जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे.संसदीय परंपरेचे उल्लंघन करून पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा सरकारला अधिकार पोहोचत नाही. तसेच विद्यमान सरकारला मिळालेल्या जनतेच्या कौलाचा अवधी फक्त ५६ दिवसांचा बाकी आहे. पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची सरकार तयारी करीत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.विद्यमान सरकारचा कार्यकाळ फक्त ५६ दिवसच बाकी असताना वर्षभरासाठी सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर कसे करू शकते, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. ५६ दिवसांपुढचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार नवीन सरकारचा असून, २६ मे २०१९ नंतर नवीन सरकार सत्तारूढ होईल.सरकारला रोखणार...संसदीय नियम आणि परंपरा धाब्यावर बसवून मोदी सरकारने असा प्रयत्न चालविला आहे. २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत मोदी सरकारने पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. आता सहावा पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे. हे सपशेल चुकीचे आहे. काँग्रेस हे कदापि खपवून घेणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोणत्याही किमतीत सरकारला असे करण्यापासून रोखण्यात येईल. अन्य पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस राष्टÑपतींकडेही दाद मागण्याच्या तयारीत आहे, असे मनीष तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBudgetअर्थसंकल्पBudget 2019अर्थसंकल्प 2019congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा