शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान चांद्रयान-2 चंद्राकडे झेपावणार, इस्रोकडून तयारी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 12:22 IST

एकीकडे देशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना तिकडे इस्रोने महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 प्रकल्पावर अंतिम हात फिरवण्यास सुरुवात केली असून, पुढच्या महिन्यात हे यान चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे देशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना तिकडे इस्रोने महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 प्रकल्पावर अंतिम हात फिरवण्यास सुरुवात केली असून, पुढच्या महिन्यात हे यान चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून इस्रोकडूनचांद्रयान-2 मोहिमेची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या यानाचे प्रक्षेपण काही तांत्रिक कारणांमुळे दोन वेळा लांबणीवर पडले होते.  2017 आणि 2018 मध्ये चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्याची घोषणा इस्रोने केली होती. मात्र ते शक्य होऊ शकले नव्हते. काही चाचण्या पूर्ण न झाल्याने चांद्रयान-2 चे प्रक्षेपण लांबणीवर पडले होते. भारताने याआधी प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 सोबत रोव्हर आणि लँडर नव्हते. मात्र यावेळी  रोव्हर आणि लँडरचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करता यावे यासाठी इस्रो प्रयत्नशील आहे. मात्र ते शक्य न झाल्यास जून महिन्यात चांद्रयानाचे प्रक्षेपण केले जाईल. त्यासाठी सातत्याने चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवान यांनी दिली.  ही आहेत चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये चांद्रयान-2 चे एकूण वजन 3 हजार 290 किलो आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर याचे ऑर्बिटर आणि लँडर वेगळे होतील. त्यानंतर लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरेल. त्यानंतर रोव्हर त्यापासून वेगळा होईल. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसरस्चा सामावे आहे. तसेच रोव्हरवरसुद्धा अनेक अत्याधुनिक उपकरणे लावण्यात आलेली आहेत. ही दोन्ही उपकरणे चंद्राच्या पृष्टभागावर सापडणारी खनिजे आणि अन्य पदार्थांबाबतची माहिती पाठवतील. त्यानंतर इस्रो त्यावर अधिक संशोधन करणार आहे.चांद्रयानाचा लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येईल. विशेष बाब म्हणजे यापैकी कुठल्याही जागी याआधी कुठल्याही देशाने लँडर उतरवलेले नाही. येथील जमीन काहीशी सपाट असल्याने रोव्हरची हालचाल करण्यात फारसे कष्ट पडणार नाहीत. तसेच रोव्हरला ऊर्जेची कमतरता पडू नये यासाठी त्याला सौर उपकरणे लावण्यात आली आहेत. याआधी 2008 मध्ये भारताने चांद्रयान 1 चे प्रक्षेपण केले होते. इंधनाच्या कमतरतेमुळे ही मोहीम 2009 मध्ये संपुष्टात आली होती. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक