शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भाजपा व काँगे्रसविरोधी आघाडीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:33 IST

तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.

हैदराबाद  - तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.देश पातळीवर काँग्रेसेतर व भाजपेतर पर्यायाची गरज असल्याचे त्यांचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. हे काही घाईत टाकलेले पाऊल नाही. राव यांची वक्तव्ये ही गांभीर्याने घेण्याची गरज टीआरएसच्या नेत्यांनी बोलून दाखवली. प्रादेशिक पक्षांना एका व्यासपीठावर आणावे ही कल्पना राव यांच्या डोक्यात आहेच, असे सांगून टीआरएसचा नेता म्हणाला की, काँग्रेस व भाजपसारख्या मोठ्या पक्षांसोबत काम करतानाचा प्रादेशिक पक्षांचा अनुभव फारसा चांगला नाही, या निष्कर्षाला केसीआर आले आहेत.राष्ट्रीय स्तरावरील मोठे राजकीय पक्ष त्यांच्या आघाडीतील भागीदार पक्षांशी फारच थोडा समन्वय राखतात, असा अनुभव आहे. हा मुद्दा महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीत सुरू असलेल्या तणावातून तसेच शेजारच्या आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष व भाजपा यांच्या नात्यात निर्माण झालेल्या तणावातून स्पष्ट होईल, असे राव म्हणाल्याचे समजते. (वृत्तसंस्था)सुरुवातीला आघाडी, नंतर एकजूटया तणावांना पूर्णविराम देण्यासाठीच राव प्रादेशिक राजकीय पक्षांना एकत्र बांधण्याची योजना तयार करीत आहेत. धर्मनिरपेक्ष विचारांच्या प्रादेशिक समविचारी पक्षांना सामाजिक न्यायाच्या समान व्यासपीठावर एकत्र आणण्याचा आमचा हेतू आहे, असे खा. बी. विनोद कुमार म्हणाले. सुरुवातीला राजकीय पक्षांची असे त्याचे स्वरूप दिसेल, पण नंतर ते एकत्र आल्याचे दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस