शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

विचारपूर्वक शरीरसंबंध ही फसवणूक नव्हे : कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:37 IST

महिलेची सहमती गैरसमजुतीवर आधारित असू शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लग्नाच्या खोट्या वचनांचे पुरावे नसतील तर महिलेने विचारपूर्वक ठेवलेल्या शारीरिक संबंधांना फसवणूक म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. अनुप कुमार मेंदीरत्ता यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात एका महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला होता. नंतर दोघांनी लग्न करून हे प्रकरण परस्परांत मिटवून घेतले. हे प्रकरण दोघांनी सहमतीने मिटविले असल्याने पुरुषाविरोधातील बलात्काराचा खटला रद्द करण्यात येत आहे, असे न्या. मेंदीरत्ता यांनी म्हटले.

या प्रकरणी महिलेने आपल्या मूळ तक्रारीत म्हटले होते की, आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून आपल्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिला. आपल्या परिवाराने आपले दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरवले आहे, असे कारण त्याने सांगितले. नंतर दोघांत समझोता होऊन दोघांनी लग्न केले. याची माहिती उच्च न्यायालयास देण्यात आली. महिलेने न्यायालयास सांगितले की, तक्रार गैरसमजुतीतून दाखल झाली होती. परिवाराच्या विरोधामुळे त्याने माझ्याशी लग्न करण्यास असमर्थता दर्शविली होती. वास्तविक तसा त्याचा मूळ हेतू नव्हता. आता मी त्या व्यक्तीसोबत आनंदाने राहत आहे. हा खटला मी पुढे चालवू इच्छित नाही. यावर न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी पुरुषाने स्वेच्छेने महिलेसोबत लग्न केले. त्यामुळे त्याने दिलेले लग्नाचे वचन मोडण्याच्या हेतूनेच दिले होते, असे म्हणता येत नाही. भादंवि कलम ३७६ (बलात्कारासाठी शिक्षा) अन्वये कार्यवाही सुरू ठेवण्याऐवजी खटला रद्द करणेच योग्य आहे. त्यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनातील सामंजस्यही टिकून राहील.

हायकोर्ट म्हणाले; थेट संबंध सिद्ध व्हायला हवाउच्च न्यायालयाने म्हटले की, पुरुषाने लग्न करण्याचे खोटे वचन दिल्याचा कोणताही पुरावा नसेल, तसेच आपल्या कृत्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजल्यानंतरही महिलेने या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा पर्याय निवडला असेल, तर शारीरिक संबंधांसाठीची तिची सहमती गैरसमजुतीवर आधारित होती, असे म्हटले जाऊ शकत नाही. न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणात पुरुषाला दोषी ठरवायचे असेल, तर त्याने दिलेले वचन आणि महिलेने शारीरिक संबंधांस दिलेली सहमती यांत थेट संबंध असल्याचे सिद्ध व्हायला हवे.

टॅग्स :Courtन्यायालयrelationshipरिलेशनशिप