शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maha Kumbh Stampede : १९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:29 IST

Prayagraj Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... 

Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज : महाकुंभमेळाव्यात आज मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील इतिहासात अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... 

भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा हा १९५४ चा कुंभमेळा होता. ३ फेब्रुवारी १९५४ ला मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, १९८६ मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये किमान २०० जणांना आपला जीव गमवावा लागला. 

१९८६ मध्ये कुंभमेळ्यात उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह हे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदारांसह हरिद्वारला पोहोचले, तेव्हा ही चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामान्य लोकांना संगम किनाऱ्यावर जाण्यापासून रोखले, त्यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. यानंतर २००३ मध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. 

२००३ मध्ये नाशिक येथे कुंभमेळ्यादरम्यान गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी हजारो भाविक एकत्र आले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत महिलांसह किमान ३९ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. यानंतर २०१३ मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (आता प्रयागराज) मध्ये कुंभमेळा पार पडला. त्यावेळी १० फेब्रुवारी २०१३ ला अलाहाबाद (आता प्रयागराज) रेल्वे स्थानकावर पादचारी पूल कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली होती. यामध्येही ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ४५ जण जखमी झाले होते. 

या घटनेनंतर आता २०२५ मध्ये म्हणजेच आज, २९ जानेवारीला मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री झालेल्या गर्दीमुळे याठिकाणी लावण्याते आलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर दहा भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.

अफवांकडे लक्ष देऊ नका - योगी आदित्यनाथया घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये, केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. जर कोणी नकारात्मक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत आणि सुरक्षित स्नान सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत सक्रिय आहे. पहाटे १-२ वाजता भाविकांनी बॅरिकेड्स ओलांडून उड्या मारल्या. त्यावेळी ही घटना  घडली, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

कशी झाली दुर्घटना?मौनी अमावस्येमुळे गंगा स्नान करण्यासाठी मंगळवारी रात्री २ वाजल्यापासून संगम किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे दोन्ही बाजूने चेंगराचेंगरी झाली. काही मिनिटांत परिस्थिती चिघळली. लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काही भाविकांचे सामान खाली पडले. त्यात लोक एकमेकांना मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी नियंत्रणातून बाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Prayagrajप्रयागराजUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथKumbh Melaकुंभ मेळा