शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Maha Kumbh Stampede : १९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:29 IST

Prayagraj Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... 

Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज : महाकुंभमेळाव्यात आज मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील इतिहासात अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडल्या होत्या, त्याबद्दल जाणून घ्या... 

भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा हा १९५४ चा कुंभमेळा होता. ३ फेब्रुवारी १९५४ ला मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, १९८६ मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये किमान २०० जणांना आपला जीव गमवावा लागला. 

१९८६ मध्ये कुंभमेळ्यात उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह हे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि खासदारांसह हरिद्वारला पोहोचले, तेव्हा ही चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामान्य लोकांना संगम किनाऱ्यावर जाण्यापासून रोखले, त्यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. यानंतर २००३ मध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. 

२००३ मध्ये नाशिक येथे कुंभमेळ्यादरम्यान गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी हजारो भाविक एकत्र आले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत महिलांसह किमान ३९ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. यानंतर २०१३ मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (आता प्रयागराज) मध्ये कुंभमेळा पार पडला. त्यावेळी १० फेब्रुवारी २०१३ ला अलाहाबाद (आता प्रयागराज) रेल्वे स्थानकावर पादचारी पूल कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली होती. यामध्येही ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ४५ जण जखमी झाले होते. 

या घटनेनंतर आता २०२५ मध्ये म्हणजेच आज, २९ जानेवारीला मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी मंगळवारी रात्री झालेल्या गर्दीमुळे याठिकाणी लावण्याते आलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर दहा भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.

अफवांकडे लक्ष देऊ नका - योगी आदित्यनाथया घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये, केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. जर कोणी नकारात्मक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत आणि सुरक्षित स्नान सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत सक्रिय आहे. पहाटे १-२ वाजता भाविकांनी बॅरिकेड्स ओलांडून उड्या मारल्या. त्यावेळी ही घटना  घडली, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

कशी झाली दुर्घटना?मौनी अमावस्येमुळे गंगा स्नान करण्यासाठी मंगळवारी रात्री २ वाजल्यापासून संगम किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे दोन्ही बाजूने चेंगराचेंगरी झाली. काही मिनिटांत परिस्थिती चिघळली. लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काही भाविकांचे सामान खाली पडले. त्यात लोक एकमेकांना मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी नियंत्रणातून बाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Prayagrajप्रयागराजUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथKumbh Melaकुंभ मेळा