शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नासाठी तयार व्हायला नवरदेव सलूनमध्ये गेला पण घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:41 IST

नवरी वरातीची वाट पाहत होती. पण लग्नाची वरात येण्यापूर्वीच वराच्या मृत्यूची बातमी आली.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये लग्नाच्या दिवशीच नवरदेचा अपघातात मृत्यू झाल्याने दोन कुटुंबांच्या आनंदावर शोककळा पसरली. ही घटना घूरपूर परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या कमलेश निषादचं 11 जून रोजी लग्न होणार होतं. वरातीची जय्यत तयारी करण्यात आली होती. नवरदेव तयारी करण्यासाठी सलूनमध्ये गेले असता त्याचा अपघात झाला. या अपघातात कमलेशचा मृत्यू झाला. 

पोलिसांना या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कमलेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दुसरीकडे कमलेशच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळताच तेथे शोककळा पसरली. नववधूलाही धक्का बसला आहे. नवरी वरातीची वाट पाहत होती. पण लग्नाची वरात येण्यापूर्वीच वराच्या मृत्यूची बातमी आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश हा बोगा बसवार गावातील रहिवासी जोखू निषाद यांचा सर्वात लहान मुलगा होता. तो तामिळनाडूतील एका कंपनीत कामाला होता. आई-वडिलांनी लग्न ठरवलं होतं, 11 जून रोजी लग्न होणार होतं. कमलेश त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक होता. महिनाभरापूर्वी रजा घेऊन तो घरी आला होता. 11 जून रोजी वरात निघणार होती. लग्नसोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. 

कमलेश त्याच्या पुतण्यासोबत तयार होण्यासाठी सलूनच्या दिशेने गेला. तेथे रस्ता ओलांडत असताना त्याचा पाय डिव्हायडरवर आदळल्याने तो खाली पडला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव बसने त्याला चिरडलं. चालकाने घाईघाईत ब्रेक लावल्याने कमलेश गंभीर जखमी झाला. लोकांनी लगेच त्याला रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न