शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
2
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
4
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
5
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
6
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
7
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
8
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
9
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
10
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
13
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
14
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
15
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
16
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
17
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
18
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
19
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
20
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण

ख्रिश्चनांनाही मोदी सरकार नकोय?; बघा आर्चबिशपने चर्चना पाठवलेलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 11:17 AM

लोकशाहीला धोका असल्यानं देशासाठी प्रार्थना करा, असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केलं आहे.

नवी दिल्लीः २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे वारे राजकीय वर्तुळात वाहू लागले असतानाच, सामाजिक क्षेत्रातही त्याचे पडघम वाजू लागल्याचे संकेत मिळताहेत. लोकशाहीला धोका असल्यानं देशासाठी प्रार्थना करा, असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या संदर्भात, त्यांनी राजधानीतील सर्व चर्चमध्ये पत्र पाठवलं आहे. या पत्रामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. 

'सध्या देशात राजकीय अशांतता पसरल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकशाही राज्यघटना आणि देशातील धर्मनिरपेक्षतेला कुठेतरी धोका निर्माण झाला आहे. २०१९ मधील निवडणुका पाहता, सर्व फादरनी प्रार्थना आणि शुक्रवारी उपवास करावा', असं आर्चबिशप यांनी पत्रात म्हटलंय. मोदी सरकार पुन्हा नको, असाच त्या पत्राचा गर्भितार्थ निघत असल्यानं त्यावरून राजकारण सुरू झालंय. 

काय लिहिलंय पत्रात?

आपला देश आणि राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणं ही आपली परंपरा आहे. परंतु, देश निवडणुकीच्या दिशेनं जात असताना ही प्रार्थना वाढवण्याची गरज आहे. २०१९ मध्ये आपल्याला नवं सरकार मिळेल. त्या दृष्टीने आत्तापासून देशासाठी प्रार्थना सुरू करू या, असं आवाहन आर्चबिशप काउटो यांनी केलंय. 

'आर्चबिशपांचे पत्र हाच लोकशाहीला धोका'

आर्चबिशप यांच्या पत्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चांगलाच संतापलाय. हे पत्र म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर चर्चचा हल्ला असल्याचं टीकास्त्र संघ स्वयंसेवक राकेश सिन्हा यांनी केला आहे. बिशपांची नियुक्ती पोप करतात. त्यामुळे भारतीय व्यवस्थेत थेट वॅटिकन हस्तक्षेप करत असल्याचंच हे द्योतक आहे, असं त्यांनी नमूद केलं. 

आर्चबिशप कार्यालयाकडून खुलासा

आर्चबिशप काउटो यांनी लिहिलेल्या पत्रात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही. 'नवं सरकार' या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातोय. प्रत्येक निवडणुकीनंतर येणारं सरकार हे नवंच असतं. असं पत्र २०१४ मध्येही पाठवण्यात आलं होतं. पण यावेळी जाणीवपूर्वक त्याला वेगळा रंग दिला जातोय, असा खुलासा फादर रॉड्रिग्स यांनी केला आहे. 

भाजपाचे खडे बोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाती-धर्माची बंधनं तोडून सर्वसमावेशक विकासाचं काम करत आहेत. आर्चबिशप यांनी फक्त थोड्या पुरागामी मानसिकतेने विचार करण्याची गरज आहे, अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. तर, अशा पद्धतीने एखाद्या समाजाला भडकवण्याचं काम करणं चुकीचं असल्याचं भाजपा नेत्या शायना एनसी यांनी सुनावलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक