शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिश्चनांनाही मोदी सरकार नकोय?; बघा आर्चबिशपने चर्चना पाठवलेलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:48 IST

लोकशाहीला धोका असल्यानं देशासाठी प्रार्थना करा, असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केलं आहे.

नवी दिल्लीः २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे वारे राजकीय वर्तुळात वाहू लागले असतानाच, सामाजिक क्षेत्रातही त्याचे पडघम वाजू लागल्याचे संकेत मिळताहेत. लोकशाहीला धोका असल्यानं देशासाठी प्रार्थना करा, असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या संदर्भात, त्यांनी राजधानीतील सर्व चर्चमध्ये पत्र पाठवलं आहे. या पत्रामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. 

'सध्या देशात राजकीय अशांतता पसरल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकशाही राज्यघटना आणि देशातील धर्मनिरपेक्षतेला कुठेतरी धोका निर्माण झाला आहे. २०१९ मधील निवडणुका पाहता, सर्व फादरनी प्रार्थना आणि शुक्रवारी उपवास करावा', असं आर्चबिशप यांनी पत्रात म्हटलंय. मोदी सरकार पुन्हा नको, असाच त्या पत्राचा गर्भितार्थ निघत असल्यानं त्यावरून राजकारण सुरू झालंय. 

काय लिहिलंय पत्रात?

आपला देश आणि राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणं ही आपली परंपरा आहे. परंतु, देश निवडणुकीच्या दिशेनं जात असताना ही प्रार्थना वाढवण्याची गरज आहे. २०१९ मध्ये आपल्याला नवं सरकार मिळेल. त्या दृष्टीने आत्तापासून देशासाठी प्रार्थना सुरू करू या, असं आवाहन आर्चबिशप काउटो यांनी केलंय. 

'आर्चबिशपांचे पत्र हाच लोकशाहीला धोका'

आर्चबिशप यांच्या पत्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चांगलाच संतापलाय. हे पत्र म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर चर्चचा हल्ला असल्याचं टीकास्त्र संघ स्वयंसेवक राकेश सिन्हा यांनी केला आहे. बिशपांची नियुक्ती पोप करतात. त्यामुळे भारतीय व्यवस्थेत थेट वॅटिकन हस्तक्षेप करत असल्याचंच हे द्योतक आहे, असं त्यांनी नमूद केलं. 

आर्चबिशप कार्यालयाकडून खुलासा

आर्चबिशप काउटो यांनी लिहिलेल्या पत्रात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही. 'नवं सरकार' या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातोय. प्रत्येक निवडणुकीनंतर येणारं सरकार हे नवंच असतं. असं पत्र २०१४ मध्येही पाठवण्यात आलं होतं. पण यावेळी जाणीवपूर्वक त्याला वेगळा रंग दिला जातोय, असा खुलासा फादर रॉड्रिग्स यांनी केला आहे. 

भाजपाचे खडे बोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाती-धर्माची बंधनं तोडून सर्वसमावेशक विकासाचं काम करत आहेत. आर्चबिशप यांनी फक्त थोड्या पुरागामी मानसिकतेने विचार करण्याची गरज आहे, अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. तर, अशा पद्धतीने एखाद्या समाजाला भडकवण्याचं काम करणं चुकीचं असल्याचं भाजपा नेत्या शायना एनसी यांनी सुनावलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक