शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ख्रिश्चनांनाही मोदी सरकार नकोय?; बघा आर्चबिशपने चर्चना पाठवलेलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:48 IST

लोकशाहीला धोका असल्यानं देशासाठी प्रार्थना करा, असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केलं आहे.

नवी दिल्लीः २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे वारे राजकीय वर्तुळात वाहू लागले असतानाच, सामाजिक क्षेत्रातही त्याचे पडघम वाजू लागल्याचे संकेत मिळताहेत. लोकशाहीला धोका असल्यानं देशासाठी प्रार्थना करा, असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या संदर्भात, त्यांनी राजधानीतील सर्व चर्चमध्ये पत्र पाठवलं आहे. या पत्रामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. 

'सध्या देशात राजकीय अशांतता पसरल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकशाही राज्यघटना आणि देशातील धर्मनिरपेक्षतेला कुठेतरी धोका निर्माण झाला आहे. २०१९ मधील निवडणुका पाहता, सर्व फादरनी प्रार्थना आणि शुक्रवारी उपवास करावा', असं आर्चबिशप यांनी पत्रात म्हटलंय. मोदी सरकार पुन्हा नको, असाच त्या पत्राचा गर्भितार्थ निघत असल्यानं त्यावरून राजकारण सुरू झालंय. 

काय लिहिलंय पत्रात?

आपला देश आणि राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणं ही आपली परंपरा आहे. परंतु, देश निवडणुकीच्या दिशेनं जात असताना ही प्रार्थना वाढवण्याची गरज आहे. २०१९ मध्ये आपल्याला नवं सरकार मिळेल. त्या दृष्टीने आत्तापासून देशासाठी प्रार्थना सुरू करू या, असं आवाहन आर्चबिशप काउटो यांनी केलंय. 

'आर्चबिशपांचे पत्र हाच लोकशाहीला धोका'

आर्चबिशप यांच्या पत्राने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चांगलाच संतापलाय. हे पत्र म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर चर्चचा हल्ला असल्याचं टीकास्त्र संघ स्वयंसेवक राकेश सिन्हा यांनी केला आहे. बिशपांची नियुक्ती पोप करतात. त्यामुळे भारतीय व्यवस्थेत थेट वॅटिकन हस्तक्षेप करत असल्याचंच हे द्योतक आहे, असं त्यांनी नमूद केलं. 

आर्चबिशप कार्यालयाकडून खुलासा

आर्चबिशप काउटो यांनी लिहिलेल्या पत्रात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही. 'नवं सरकार' या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातोय. प्रत्येक निवडणुकीनंतर येणारं सरकार हे नवंच असतं. असं पत्र २०१४ मध्येही पाठवण्यात आलं होतं. पण यावेळी जाणीवपूर्वक त्याला वेगळा रंग दिला जातोय, असा खुलासा फादर रॉड्रिग्स यांनी केला आहे. 

भाजपाचे खडे बोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाती-धर्माची बंधनं तोडून सर्वसमावेशक विकासाचं काम करत आहेत. आर्चबिशप यांनी फक्त थोड्या पुरागामी मानसिकतेने विचार करण्याची गरज आहे, अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. तर, अशा पद्धतीने एखाद्या समाजाला भडकवण्याचं काम करणं चुकीचं असल्याचं भाजपा नेत्या शायना एनसी यांनी सुनावलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक