शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ज्याला मुख्यमंत्री केलं, त्याच्याच कट्टर विरोधकाला बळ देणार? प्रशांत किशोर यांच्या भेटीने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 12:45 IST

प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची रणनीती आखली होती.

Prashant Kishore ( Marathi News ) : मागील काही वर्षांत भारतीय राजकारणात तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने आखल्या जाणाऱ्या रणनीतीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. निवडणूक रणनीतीच्या बाबतीत भारतात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव म्हणजे प्रशांत किशोर. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतरच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या विजयात प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. याच प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची रणनीती आखण्याचं काम पाहिलं होतं आणि त्या निवडणुकीत रेड्डी यांच्या पक्षाला प्रचंड बहुमतही मिळालं होतं. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र ही संस्था जगनमोहन रेड्डी यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या टीडीपी पक्षाचे काम करणार असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर नुकतीच टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू आणि प्रशांत किशोर यांची भेटही झाली आहे.

प्रशांत किशोर यांनी चंद्रबाबू नायडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. मी यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचा निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र असं असतानाही त्यांनी चंद्रबाबू नायडू यांची भेट घेऊन तब्बल तीन तास खलबतं केल्याने ते टीडीपीच्या रणनीतीला हातभार लावणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भेटीनंतर काय म्हणाले प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांनी चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीनंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. "अनेक दिवसांपासून आमची ही भेट प्रलंबित होती आणि मी त्यांना म्हटलं होतं की एखाद्या दिवशी भेटायला येईल. त्यानुसार आज मी आलो आहे," असा खुलासा किशोर यांनी केला आहे.

वायएसआर काँग्रेसने साधला निशाणा

प्रशांत किशोर आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीनंतर वायएसआर काँग्रेस पक्षाच्या एकामागोमाग एक करत अनेक नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. "जेव्हा मूळ साहित्यच खराब असेल तर गवंडी येऊन तरी काय करणार," अशा शब्दांत जगनमोहन रेड्डी यांचे खंदे समर्थक आणि आंध्र प्रदेशचे जलसंपदा मंत्री ए रामबाबू यांनी या भेटीवर टीका केली आहे. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAndhra Pradeshआंध्र प्रदेश