शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"लोकसभेत शून्य खासदार आणि बोलतात PM करण्याबाबत?", प्रशांत किशोरांचा लालूंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:49 IST

प्रशांत किशोर म्हणाले की, लालू प्रसाद यादव आणि आरजेडी नेते फक्त बोलणारे आहेत.

दरभंगा : जन सुराजचे नेते प्रशांत किशोर यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी नितीश कुमार पंतप्रधान होण्याबाबत केलेल्या दाव्यांचा समाचार घेतला. 

प्रशांत किशोर म्हणाले की, लालू प्रसाद यादव आणि आरजेडी नेते फक्त बोलणारे आहेत. आता तुम्ही राजदची स्थिती पाहता संपूर्ण लोकसभेत 543 पैकी या पक्षाचे 0 खासदार आहेत. लालू प्रसाद यादव इथे त्यांच्या घरी बसतात आणि 4 पत्रकारांना बोलावतात आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार, हे ठरवतात? ज्या पक्षाचे खासदार शून्य आहेत, तो पक्ष देशाचा पंतप्रधान कोण होणार? हे ठरवत आहे, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.

याचबरोबर, "2015 मध्ये आम्हीच लालू यादव आणि नितीश कुमार यांना एकत्र आणले होते. त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे? हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. नितीशकुमार यांना लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याविषयी प्रेम नाही. बिहार रिकामा झाला तर आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा म्हणून लालू यादव रोज नितीशकुमारांना दिल्लीत ढकलत आहेत. तसेच, खुर्ची टिकून राहावी म्हणून नितीश कुमार त्यांच्यासोबत आहेत", असे प्रशांत किशोर म्हणाले. 

बिहारच्या जनतेने नितीश कुमार यांचे 42 आमदार निवडून दिले आहेत. नितीश कुमार या जनतेला धडा शिकवण्यासाठी लालू यादवांचे जंगलराज परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावरही टीका केली. "जंगलराज परत आल्यावर लोक म्हणतील की, नितीशकुमार यांना विनाकारण हटविले, ते चांगले होते. जर वाईट सरकार सत्तेवर आले तरच लोक नितीशकुमार यांच्याबद्दल चांगले बोलतील. बिहारमध्ये चांगले सरकार आले तर लोक म्हणतील हे चांगले झाले की बिहारची प्रगती सुरू झाली. पण यापेक्षा वाईट सरकार आले तर लोक म्हणतील नितीशकुमार बरे होते", असेही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव