शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राहुल गांधी होऊ शकता पंतप्रधान, काँग्रेसशिवाय बलशाली विरोधीपक्ष अशक्य; पीकेंचा सूर बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:57 IST

असा कोणता नेता आहे, ज्याच्यासोबत कधीच काम करायला आवडणार नाही? असा प्रश्नही पीके यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी त्यांना राहुल गांधी, अमरिंदर सिंग, नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी हे पर्याय देण्यात आले होते. यावर त्यांनी अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले.

नवी दिल्ली - देशातील जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसोबत काम केलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उघडपणे आणि ममतांच्या वक्तव्यांच्या अगदी उलटे मत मांडले. काँग्रेसशिवाय बलशाली विरोधी पक्ष होण्याची शक्यता कमी आहे, असे पीके म्हणाले. याच बरोबर एका प्रश्नाला उत्तर देताना पीके यांनी, भाजप उत्तर प्रदेशात 2017 च्या तुलनेत 2022 मध्ये अधिक जागा आणू शकतो, असेही म्हटले आहे.

प्रशांत किशोर 'टाइम्स नाऊ'च्या फ्रँकली स्पीकिंग शोमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले. याला त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तरे दिली. यादरम्यान, असा कोणता नेता आहे, की ज्याच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी नितीश कुमारांचे नाव घेतले. यावेळी, आपले नितीश यांच्याशी बोलणे होते का, असे विचारले असता, ते म्हणआले, 'माझे बोलणे सुरू असते.' खरे तर, प्रशांत किशोर यांनी सप्टेंबर 2018 मध्ये JDU मध्ये सामील होऊन राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण त्यांनी लवकरच पक्ष आणि राजकारण दोन्ही सोडले.

याशिवाय, असा कोणता नेता आहे, ज्याच्यासोबत कधीच काम करायला आवडणार नाही? असा प्रश्नही पीके यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी त्यांना राहुल गांधी, अमरिंदर सिंग, नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी हे पर्याय देण्यात आले होते. यावर त्यांनी अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले.

राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात -राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात की नाही, या प्रश्नावर किशोर यांनी ते पंतप्रधान होऊ शकतात, असे उत्तर दिले. याचबरोबर गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्ष चालू शकतो, असेही ते म्हणाले. प्रशांत किशोर यांना, गांधी कुटुंबीय काँग्रेसला बिगर गांधी नेत्याच्या नेतृत्वाखाली चालवू देतील का असा प्रश्नही विचारला असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मात्र, काँग्रेसच्या उर्वरित नेत्यांची इच्छा असेल तर हे होऊ शकते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमारMamata Banerjeeममता बॅनर्जी