शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

“१० वर्षांत केवळ अपयशच, राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यावा”; प्रशांत किशोर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:24 IST

Prashant Kishor News: राहुल गांधी यांना असे वाटते की, त्यांना सगळे माहिती आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.

Prashant Kishor News: गेल्या १० वर्षांत राहुल गांधी काँग्रेसला सक्षमपणे चालवण्यात अपयशी ठरत आहेत. गेल्या १० वर्षांत काँग्रेसला अनेक ठिकाणी, अनेकदा अपयश पचवावे लागले आहे. असे असूनही पक्षाची कमान दुसऱ्या कोणाच्या हाती द्यायला हे लोक तयार नाहीत. गेल्या १० वर्षांत एकच काम कोणतेही यश मिळत नसताना सातत्याने केले जात आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यायला हरकत नाही. पुढील ५ वर्षांसाठी पक्षाची धुरा कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सोपवावी, असा सल्ला रणनीतिकार आणि राजकारणातील चाणक्य मानले जाणारे प्रशांत किशोर यांनी दिला आहे. 

एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. जगभरात अनेक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडे अनेक गुण आहेत. जर काही कमतरता असतील, तर त्या ओळखून त्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्न करतात. मात्र, राहुल गांधी यांना असे वाटते की, त्यांना सगळे माहिती आहे. जर तुम्हाला वाटत नसेल की, तुम्हाला मदतीची गरज आहे, तर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही, ही गोष्ट सत्य आहे. राहुल गांधी यांना असे वाटते की, आपल्याला योग्य वाटेल ते काम अमलात आणणारा कोणीतरी हवा आहे. पण हे शक्य नाही, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला.

जे बोलले, त्याच्या अगदी उलट काम केले

२०१९ मध्ये निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. राहुल गांधी यांनी तेव्हा सांगितले होते की, माघार घेईन आणि काँग्रेसचा कार्यभार दुसऱ्या कुणाच्या हातात देईन. मात्र, प्रत्यक्षात राहुल गांधी जे बोलले, त्याच्या अगदी उलट काम केले. अनेक नेते खासगीत बोलताना सांगतात की, एका व्यक्तीच्या परवानगीशिवाय पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेतला जात नाही. सातत्याने अपयश येऊनही पक्षासाठी एकट्याने काम करावे लागेल, असा आग्रह राहुल गांधींनी धरू नये, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर काँग्रेस पक्ष ४४ जागाच जिंकू शकला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रभावही मर्यादित होता, तरीही काँग्रेसला अपेक्षित परिणाम साध्य करता आला नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४