शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

“१० वर्षांत केवळ अपयशच, राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यावा”; प्रशांत किशोर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 10:24 IST

Prashant Kishor News: राहुल गांधी यांना असे वाटते की, त्यांना सगळे माहिती आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.

Prashant Kishor News: गेल्या १० वर्षांत राहुल गांधी काँग्रेसला सक्षमपणे चालवण्यात अपयशी ठरत आहेत. गेल्या १० वर्षांत काँग्रेसला अनेक ठिकाणी, अनेकदा अपयश पचवावे लागले आहे. असे असूनही पक्षाची कमान दुसऱ्या कोणाच्या हाती द्यायला हे लोक तयार नाहीत. गेल्या १० वर्षांत एकच काम कोणतेही यश मिळत नसताना सातत्याने केले जात आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आता थोडा ब्रेक घ्यायला हरकत नाही. पुढील ५ वर्षांसाठी पक्षाची धुरा कुणा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सोपवावी, असा सल्ला रणनीतिकार आणि राजकारणातील चाणक्य मानले जाणारे प्रशांत किशोर यांनी दिला आहे. 

एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. जगभरात अनेक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडे अनेक गुण आहेत. जर काही कमतरता असतील, तर त्या ओळखून त्यात सुधारणा करण्याच्या प्रयत्न करतात. मात्र, राहुल गांधी यांना असे वाटते की, त्यांना सगळे माहिती आहे. जर तुम्हाला वाटत नसेल की, तुम्हाला मदतीची गरज आहे, तर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही, ही गोष्ट सत्य आहे. राहुल गांधी यांना असे वाटते की, आपल्याला योग्य वाटेल ते काम अमलात आणणारा कोणीतरी हवा आहे. पण हे शक्य नाही, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला.

जे बोलले, त्याच्या अगदी उलट काम केले

२०१९ मध्ये निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. राहुल गांधी यांनी तेव्हा सांगितले होते की, माघार घेईन आणि काँग्रेसचा कार्यभार दुसऱ्या कुणाच्या हातात देईन. मात्र, प्रत्यक्षात राहुल गांधी जे बोलले, त्याच्या अगदी उलट काम केले. अनेक नेते खासगीत बोलताना सांगतात की, एका व्यक्तीच्या परवानगीशिवाय पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेतला जात नाही. सातत्याने अपयश येऊनही पक्षासाठी एकट्याने काम करावे लागेल, असा आग्रह राहुल गांधींनी धरू नये, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर काँग्रेस पक्ष ४४ जागाच जिंकू शकला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रभावही मर्यादित होता, तरीही काँग्रेसला अपेक्षित परिणाम साध्य करता आला नाही, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरRahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४