शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Prashant Kishor: भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला काय करावं लागेल? प्रशांत किशोर यांनी सांगितला प्लान! काय म्हणाले रणनीतीकार? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 12:52 IST

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची सध्याची अवस्थेवर एका टेलिव्हिजन कार्यक्रमात भाष्य करताना राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

नवी दिल्ली-

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची सध्याची अवस्थेवर एका टेलिव्हिजन कार्यक्रमात भाष्य करताना राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. किशोर यांनी काँग्रेस पक्षाला काही सल्ले देऊ केले आहेत. "देशात केवळ विरोधकांना एकत्र करुन काँग्रेसला भाजपाला पराभूत करता येणार नाही. यासाठी काँग्रेसला स्वत:च्याच पक्षात आधी बरेच बदल करावे लागतील", असं प्रशांत किशोर म्हणाले. 

काँग्रेस पक्ष सध्या कठीण काळातून जात आहे. पक्षाचे अनेक जुने जाणते नेते सत्ताधारी भाजपामध्ये सामील झाले आहेत. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच प्रशांत किशोर देखील काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. यातच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या भवितव्याबाबत काही विधानं आणि सल्ले देऊ केले आहेत. 

"काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर पक्षात काही बदल करावे लागतील. पक्षाचा अध्यक्ष कोण असावा हे मी सांगणार नाही. पण केवळ विरोधी पक्षांची मोट बांधली म्हणजे भाजपाचा पराभव होईल अशा विचारात राहू नये. विरोधक म्हणजे काँग्रेस पक्ष या विचारुन पक्षाला बाहेर यावं लागेल. काँग्रेसला स्वत:ला आधी पक्षाचा अध्यक्ष कोणाला करायला हवं याचा निर्णय घ्यावा लागेल", असं प्रशांत किशोर म्हणाले. 

"एक राजकीय पक्ष म्हणून पक्षाचा ग्राफ खूप खाली गेला आहे. सर्वात आधी तर पक्षाला आपल्या निर्णय घेण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. निर्णयाच्या पद्धतीसोबतच वेगानं निर्णय घेणं, स्थानिक नेत्यांना सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे. याशिवाय पक्षात निर्णय घेण्याच्या अधिकाऱ्यांचं केंद्रीकरण काँग्रेसनं करू नये. इतर नेत्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची गरज आहे. पक्षाला पुढे जाऊन विजय प्राप्त करण्यासाठी आधी स्वत:मध्ये खूप बदल करावे लागणार आहेत. यासाठी तुम्हाला प्रशांत किशोर किंवा इतर कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. यासोबतच जो कोणी पक्षाचा अध्यक्ष बनेल तो पूर्णवेळ अध्यक्ष अला पाहिजे", असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी