शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारचं केलं कौतुक; राहुल गांधींवर साधला जोरदार निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 17:00 IST

Prashant Kishor And Narendra Modi : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पाटणा येथे आयोजित जन सुराज महिला संवादात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून बिहारच्या नेत्यांचीही खरडपट्टी काढली. जातनिहाय जनगणनेमुळे बिहारमधील गरिबी दूर झाली का? असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींनी काँग्रेस शासित राज्यात जातनिहाय जनगणना करावी असंही म्हटलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देत केंद्रातील मोदी सरकारने शनिवारी युनिफाइड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली. प्रशांत किशोर यांनी केंद्र सरकारच्या या पावलाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, "केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस स्कीम आणली आहे, ज्यामध्ये २३ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्राने ओपीएस आणि एनपीएसमध्ये मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे"

"तेजस्वी यादव विकासावर बोलतात तेव्हा ते हास्यास्पद वाटतं"

प्रशांत किशोर म्हणाले की, आरजेडी नेते तेजस्वी यादव जेव्हा विकासावर बोलतात तेव्हा ते हास्यास्पद वाटतं. तेजस्वी यादव सहा महिन्यांपूर्वीपर्यंत नितीश कुमार यांच्यासोबत होते. नितीश कुमार यांनी कर्मचाऱ्यांचे अधिकार हिरावून घेतले आहेत. जन सुरज २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहेत, ज्यामध्ये ४० टक्के महिला उमेदवार असतील. बिहारमध्ये महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आता बिहारमध्ये लालू यादव, नरेंद्र मोदी यांची सत्ता नाही. नितीश कुमारांची नव्हे तर जनतेची सत्ता हवी."

महिलांना आव्हान केलं की मुलांना शिक्षण द्या. 

"ज्या नेत्यांनी बिहारला लुटलं, ज्यांनी येथील जनतेला कंगाल केलं आणि मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केलं, अशा नेत्यांना मतदान करू नये. त्यांनी तेथे उपस्थित महिलांना आव्हान केलं की मुलांना शिक्षण द्या. तुमची मुलं जोपर्यंत शिकत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणीही डॉक्टर आणि इंजिनिअर बनवू शकत नाही" असंही त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBiharबिहार