शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Prashant Kishor: “नितीश कुमारांना सांगितले होते की मुख्यमंत्री होऊ नका, महाआघाडी टिकणार नाही”: प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 20:40 IST

Prashant Kishor: पुढील विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील सात पक्ष एकत्र राहून लढू शकत नाहीत, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor: आताच्या घडीला बिहारमध्ये महाआघाडीमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच राजकारणातील चाणक्य म्हणून ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांनी या सर्व प्रकरावर सडेतोड शब्दांत भाष्य केले आहे. महाआघाडी प्रयोग फार काळ टिकणारा नाही. मागील निवडणुका झाल्यावर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होऊ नये, असा सल्ला दिला होता, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, ही महाआघाडी किती काळ टिकेल हे मी सांगू शकत नाही, पण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ती टिकणार नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत हे ७ पक्ष एकत्र राहून निवडणूक लढवू शकत नाहीत. मी आघाडीचे राजकारण पाहिले आहे. सन २०१५ मध्ये मी महाआघाडी केली होती, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्ग निवडला आहे. जर कोणी चुकीचा मार्ग निवडला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात, अशी टीका प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर केली. 

नितीश कुमारांना सांगितले होते की मुख्यमंत्री होऊ नका

सन २०२० मध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सांगितले होते की, तुम्ही मुख्यमंत्री बनू नका. कारण बिहारच्या जनतेने तुम्हाला नाकारले आहे, मग तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची काय गरज आहे? आणि जर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर अन्य कुणी मोठा भाऊ होईल. ज्याचे नंबर जास्त असतील, त्यावेळी तुमचे काही चालणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, असे अनेकांना वाटते, याबाबत विचारले असता, मला सरकारमध्ये जावे असे वाटले असेल तर पदयात्रा केली नसती. एक फोन केल्यावर तसे घडू शकेल. नितीश कुमार मला दररोज फोन करतात आणि काहीही करून मदत करा, असे सांगतात. सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे वाटल्यास उद्याही होऊ शकेन, असे प्रशांत किशोर म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार