शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Prashant Kishor: “नितीश कुमारांना सांगितले होते की मुख्यमंत्री होऊ नका, महाआघाडी टिकणार नाही”: प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 20:40 IST

Prashant Kishor: पुढील विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील सात पक्ष एकत्र राहून लढू शकत नाहीत, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor: आताच्या घडीला बिहारमध्ये महाआघाडीमध्ये संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच राजकारणातील चाणक्य म्हणून ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांनी या सर्व प्रकरावर सडेतोड शब्दांत भाष्य केले आहे. महाआघाडी प्रयोग फार काळ टिकणारा नाही. मागील निवडणुका झाल्यावर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होऊ नये, असा सल्ला दिला होता, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, ही महाआघाडी किती काळ टिकेल हे मी सांगू शकत नाही, पण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत ती टिकणार नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत हे ७ पक्ष एकत्र राहून निवडणूक लढवू शकत नाहीत. मी आघाडीचे राजकारण पाहिले आहे. सन २०१५ मध्ये मी महाआघाडी केली होती, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्ग निवडला आहे. जर कोणी चुकीचा मार्ग निवडला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात, अशी टीका प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर केली. 

नितीश कुमारांना सांगितले होते की मुख्यमंत्री होऊ नका

सन २०२० मध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सांगितले होते की, तुम्ही मुख्यमंत्री बनू नका. कारण बिहारच्या जनतेने तुम्हाला नाकारले आहे, मग तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची काय गरज आहे? आणि जर तुम्ही मुख्यमंत्री झालात तर अन्य कुणी मोठा भाऊ होईल. ज्याचे नंबर जास्त असतील, त्यावेळी तुमचे काही चालणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, असे अनेकांना वाटते, याबाबत विचारले असता, मला सरकारमध्ये जावे असे वाटले असेल तर पदयात्रा केली नसती. एक फोन केल्यावर तसे घडू शकेल. नितीश कुमार मला दररोज फोन करतात आणि काहीही करून मदत करा, असे सांगतात. सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे वाटल्यास उद्याही होऊ शकेन, असे प्रशांत किशोर म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार