शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

"१३ कोटी जनतेच्या नेत्याने मोदींच्या पाया पडून इज्जत घालवली"; नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 19:11 IST

प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श केल्याचा आरोप केला

Prashant Kishor : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी हे  तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ७१ मंत्र्यांसह आपला कारभार सुरु केला आहे. या सरकारच्या स्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा मोठा वाटा आहे. अशातच आता राजकीय रणनीतीकार बनलेले नेते प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आरोप केले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श केल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.

जन सुरज अभियानाअंतर्गत शुक्रवारी भागलपूरमध्ये एका सभेत बोलताना प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. "लोक मला विचारतात की मी नितीश कुमार यांच्यासोबत यापूर्वी काम केले असूनही मी त्यांच्यावर टीका का करतो? पण, त्यावेळी तो वेगळा माणूस होता. त्यांच्यातील विवेकबुद्धी आता कमी होत चाललली आहे," असे प्रशांत किशोर यांनी म्हटलं. प्रशांत किशोर यांनी २०१५ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयूच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. दोन वर्षांनंतर त्यांनी औपचारिकपणे जेडीयूमध्ये प्रवेश केला. मात्र, नितीश कुमार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर २०२० मध्ये त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. 

त्यानंतर बोलताना प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीचा हवाला देत नितीशकुमार यांच्यावर भाष्य केले. एनडीएच्या या बैठकीत नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा देणारे भाषण केले. भाषण संपवून पुन्हा आपल्या आसनावर बसलताना नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय स्पर्श करताना दिसले. मात्र, पंतप्रधानांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. या घटनेवरून प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली.

“काही दिवसांपूर्वी देशाने पाहिले असेल की,माध्यमातील लोक भारत सरकारची कमान नितीश कुमार यांच्या हातात असल्याचे सांगत होते. नितीशकुमारांची इच्छा नसेल तर देशात सरकार स्थापन होणार नाही. नितीशकुमार यांच्या हातात इतकी सत्ता आहे. पण ते म्हणाले, नितीश कुमारांनी त्या बदल्यात काय मागितले? बिहारच्या मुलांना रोजगार मागितला नाही. बिहारमधील जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने सुरू झाले पाहिजेत, अशी मागणी केली नाही. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी नव्हती. बिहारचे लोक विचार करत असतील की मग त्यांनी काय मागितले? २०२५ नंतरही मुख्यमंत्री राहावे आणि यासाठी भाजपनेही पाठिंबा द्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली. त्यांनी बिहारच्या सर्व जनतेची इज्जत विकली," असे प्रशांत किशोर म्हणाले. 

"१३ कोटी जनतेचा नेता, जो आपल्या जनतेचा अभिमान आणि आदर आहे, तो मुख्यमंत्री राहण्यासाठी संपूर्ण देशासमोर नतमस्तक होऊन पाय स्पर्श करत आहे. पण नितीश कुमार यांनी मोदींच्या पायाला हात लावून बिहारला लाजवले," अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात नितीश कुमार यांच्या पक्षाने १२ जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत जेडीयू हा भाजपचा दुसरा सर्वात मोठा मित्रपक्ष आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी