शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांचा २०२४ चा फॉर्म्युला, काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:32 IST

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये निराशा पसरली आहे. काँग्रेसला(Congress) नव संजीवनी देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishore) यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्यासमोर फॉर्म्युला ठेवला आहे. काँग्रेसची भरकटलेली दिशा पुन्हा रुळावर आणण्यासाठी पीकेने एक रोडमॅप तयार केला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांचे हे प्रेझेंटेशन आहे.

शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिग्विजय सिंह, के.सी वेणुगोपाळ, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेस आणि २०२४ निवडणूक याबाबत एक्शन प्लॅन सादर केला. पीकेने काँग्रेसच्या मीडिया रणनीतीत बदल करणे, संघटना मजबूत करणे आणि त्या राज्यांवर फोकस करणे ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे. पीकेचा प्लॅन आणि फॉर्म्युला यासाठी काँग्रेस नेत्यांचा एक गट बनवला आहे. आठवडाभरात हा गट सोनिया गांधींना रिपोर्ट देईल. त्यानंतर पीकेची काँग्रेसमध्ये एन्ट्री आणि फॉर्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम हाती घेतले जाईल.

३७० जागांवर लक्ष केंद्रीत

प्रशांत किशोरने काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं. विशेष म्हणजे काँग्रेसनं अशा ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी जिथे पक्षसंघटन मजबूत आहे. ५४३ जागांऐवजी मोजक्या ३६५ ते ३७० जागा निवडून त्याठिकाणी उमेदवार उतरवावे. त्यामुळे पक्षाला त्याचा फायदा होईल. तसेच इतर १७० ते १८० जागांवर काँग्रेसचे सहकारी पक्ष निवडणूक लढवतील. ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे अशा जागांवर पक्षाने लढत द्यावी असं पीकेने सांगितले आहे.

यूपी-बिहार-ओडिशात एकला चलो रे

देशातील ज्या राज्यात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे त्याठिकाणी पक्षाने लक्ष द्यावे. त्या राज्यात आघाडी युती ऐवजी एकला चलो रे यावर भर द्यावा. त्यात गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड याठिकाणी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी. त्याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यातही काँग्रेसनं एकटं लढावं. जेणेकरून या राज्यात हरवलेला जनाधार पुन्हा परत मिळवता येईल.

बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आघाडी

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला ज्या राज्यात आघाडी करून निवडणूक लढण्याचा सल्ला दिलाय ज्याठिकाणी स्थानिक प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू सारख्या राज्यात काँग्रेसनं आघाडीत निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत(Shivsena-NCP) काँग्रेस सरकारमध्ये आहे. तामिळनाडूत डिएमकेसोबत आघाडी आहे. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं डाव्या पक्षांऐवजी टीएमसीसोबत निवडणूक लढवावी असा फॉर्म्युला पीकेने काँग्रेस नेतृत्वाला सांगितला आहे.  

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोरNCPराष्ट्रवादी काँग्रेस