शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

प्रशांत किशोर यांचा २०२४ चा फॉर्म्युला, काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:32 IST

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये निराशा पसरली आहे. काँग्रेसला(Congress) नव संजीवनी देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishore) यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्यासमोर फॉर्म्युला ठेवला आहे. काँग्रेसची भरकटलेली दिशा पुन्हा रुळावर आणण्यासाठी पीकेने एक रोडमॅप तयार केला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांचे हे प्रेझेंटेशन आहे.

शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिग्विजय सिंह, के.सी वेणुगोपाळ, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेस आणि २०२४ निवडणूक याबाबत एक्शन प्लॅन सादर केला. पीकेने काँग्रेसच्या मीडिया रणनीतीत बदल करणे, संघटना मजबूत करणे आणि त्या राज्यांवर फोकस करणे ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे. पीकेचा प्लॅन आणि फॉर्म्युला यासाठी काँग्रेस नेत्यांचा एक गट बनवला आहे. आठवडाभरात हा गट सोनिया गांधींना रिपोर्ट देईल. त्यानंतर पीकेची काँग्रेसमध्ये एन्ट्री आणि फॉर्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम हाती घेतले जाईल.

३७० जागांवर लक्ष केंद्रीत

प्रशांत किशोरने काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं. विशेष म्हणजे काँग्रेसनं अशा ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी जिथे पक्षसंघटन मजबूत आहे. ५४३ जागांऐवजी मोजक्या ३६५ ते ३७० जागा निवडून त्याठिकाणी उमेदवार उतरवावे. त्यामुळे पक्षाला त्याचा फायदा होईल. तसेच इतर १७० ते १८० जागांवर काँग्रेसचे सहकारी पक्ष निवडणूक लढवतील. ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे अशा जागांवर पक्षाने लढत द्यावी असं पीकेने सांगितले आहे.

यूपी-बिहार-ओडिशात एकला चलो रे

देशातील ज्या राज्यात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे त्याठिकाणी पक्षाने लक्ष द्यावे. त्या राज्यात आघाडी युती ऐवजी एकला चलो रे यावर भर द्यावा. त्यात गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड याठिकाणी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी. त्याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यातही काँग्रेसनं एकटं लढावं. जेणेकरून या राज्यात हरवलेला जनाधार पुन्हा परत मिळवता येईल.

बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आघाडी

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला ज्या राज्यात आघाडी करून निवडणूक लढण्याचा सल्ला दिलाय ज्याठिकाणी स्थानिक प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू सारख्या राज्यात काँग्रेसनं आघाडीत निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत(Shivsena-NCP) काँग्रेस सरकारमध्ये आहे. तामिळनाडूत डिएमकेसोबत आघाडी आहे. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं डाव्या पक्षांऐवजी टीएमसीसोबत निवडणूक लढवावी असा फॉर्म्युला पीकेने काँग्रेस नेतृत्वाला सांगितला आहे.  

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोरNCPराष्ट्रवादी काँग्रेस