शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांचा २०२४ चा फॉर्म्युला, काँग्रेस शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:32 IST

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये निराशा पसरली आहे. काँग्रेसला(Congress) नव संजीवनी देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर(Prashant Kishore) यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्यासमोर फॉर्म्युला ठेवला आहे. काँग्रेसची भरकटलेली दिशा पुन्हा रुळावर आणण्यासाठी पीकेने एक रोडमॅप तयार केला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांचे हे प्रेझेंटेशन आहे.

शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिग्विजय सिंह, के.सी वेणुगोपाळ, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेस आणि २०२४ निवडणूक याबाबत एक्शन प्लॅन सादर केला. पीकेने काँग्रेसच्या मीडिया रणनीतीत बदल करणे, संघटना मजबूत करणे आणि त्या राज्यांवर फोकस करणे ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे. पीकेचा प्लॅन आणि फॉर्म्युला यासाठी काँग्रेस नेत्यांचा एक गट बनवला आहे. आठवडाभरात हा गट सोनिया गांधींना रिपोर्ट देईल. त्यानंतर पीकेची काँग्रेसमध्ये एन्ट्री आणि फॉर्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम हाती घेतले जाईल.

३७० जागांवर लक्ष केंद्रीत

प्रशांत किशोरने काँग्रेस नेतृत्वाला जो फॉर्म्युला सांगितला आहे ज्यात देशातील सर्व ५४३ लोकसभा जागांऐवजी काँग्रेसनं काही निवडक जागांवर लक्ष केंद्रीत करावं. विशेष म्हणजे काँग्रेसनं अशा ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी जिथे पक्षसंघटन मजबूत आहे. ५४३ जागांऐवजी मोजक्या ३६५ ते ३७० जागा निवडून त्याठिकाणी उमेदवार उतरवावे. त्यामुळे पक्षाला त्याचा फायदा होईल. तसेच इतर १७० ते १८० जागांवर काँग्रेसचे सहकारी पक्ष निवडणूक लढवतील. ज्याठिकाणी भाजपाशी थेट मुकाबला आहे अशा जागांवर पक्षाने लढत द्यावी असं पीकेने सांगितले आहे.

यूपी-बिहार-ओडिशात एकला चलो रे

देशातील ज्या राज्यात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे त्याठिकाणी पक्षाने लक्ष द्यावे. त्या राज्यात आघाडी युती ऐवजी एकला चलो रे यावर भर द्यावा. त्यात गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड याठिकाणी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवावी. त्याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यातही काँग्रेसनं एकटं लढावं. जेणेकरून या राज्यात हरवलेला जनाधार पुन्हा परत मिळवता येईल.

बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आघाडी

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला ज्या राज्यात आघाडी करून निवडणूक लढण्याचा सल्ला दिलाय ज्याठिकाणी स्थानिक प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू सारख्या राज्यात काँग्रेसनं आघाडीत निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत(Shivsena-NCP) काँग्रेस सरकारमध्ये आहे. तामिळनाडूत डिएमकेसोबत आघाडी आहे. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं डाव्या पक्षांऐवजी टीएमसीसोबत निवडणूक लढवावी असा फॉर्म्युला पीकेने काँग्रेस नेतृत्वाला सांगितला आहे.  

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोरNCPराष्ट्रवादी काँग्रेस