शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मोदींनी २०१४ साली शपथ घेताना मुखर्जींकडे मागितला होता आठवड्याभराचा वेळ, काय होतं कारण?

By मोरेश्वर येरम | Updated: January 7, 2021 09:17 IST

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.

नवी दिल्लीदेशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या The Presidential Years या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचे अनेक उल्लेख आहेत. मोदी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात काही मुद्द्यांवरुन विस्तव जात नसल्याचंही अनेक प्रसंगातून दिसून आलं आहे. 

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. तर काही निर्णयांबद्दल कौतुकाचा वर्षाव देखील केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद होते, पण मुखर्जी यांच्या मनात मोदींच्या देशाप्रती असलेल्या समर्पण भावनेबद्दल अत्यंत सन्मान होता. 

२०१४ साली लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भेटायला आले तेव्हा मोदी त्यांच्यासोबत एका वृत्तापत्राचे कात्रण घेऊन आले होते. मुखर्जींनी दिलेल्या मुलाखतीचे ते कात्रण होते. मुलाखतीत मुखर्जींनी देशाला स्थिर जनादेशाची आशा व्यक्त केली होती. 

"नरेंद्र मोदींनी शपथ ग्रहणासाठी माझ्याकडे एका आठवड्याचा कालावधी मागितला तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. गुजरातमध्ये आपला उत्तराधिकाऱ्याचा मुद्दा सोडवायचा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं", असं प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. 

मोदींच्या परराष्ट्र नितीने प्रभावितपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र व्यवहार नितीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रभावित झाले होते. यासाठी पंतप्रधान मोदी अनेकदा सल्ला घेण्यासाठी भेट घ्यायचे. आपल्या शपथविधी सोहळ्याला सार्क परिषदेच्या नेत्यांना निमंत्रित करण्याच्या विचार देखील मोदींनी मांडला होता आणि त्यास मुखर्जी यांनी मंजुरी देत त्यांचं अभिनंदन केलं होतं. यावेळी मुखर्जी यांनी मोदींना देशाच्या गुप्तचर विभागाशी याबाबत चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. कारण अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंकाच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा मुद्दा याच्याशी निगडीत होता. 

२०१४ साली भाजपच्या बहुमताबाबतचे विधानदेशात २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी पियूष गोयल यांनी केलेल्या बहुमताच्या दाव्यावर आपल्याला शंका होती, असं मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलंय. "नरेंद्र मोदींचा प्रचाराचा भरगच्च कार्यक्रम पाहिल्यानंतर मी त्यांच्या दाव्याकडे गंभीरतेने पाहू लागलो. मोदी देशाच्या जनतेच्या पसंतीस उतरले आणि त्यांनी आपला दावा सिद्ध करुन दाखवला", असं मुखर्जींनी पुस्तकात म्हटलं आहे. 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीPresidentराष्ट्राध्यक्षNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा