शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:11 IST

पंतप्रधानांना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

Prakash Ambedkar on PM Modi: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रत्येकजण काय कारवाई होणार याकडे लक्ष लावून आहे. दुसरीकडे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत कठोर पावले उचलताना दिसत आहे.अशातच पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी लष्कराला मोकळीक दिल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी आता लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य असण्याची शक्यता आहे. मात्र यावरुनच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधानांना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

पहलगाममध्येएका नेपाळी नागरिकासह २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत लष्कराच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पाकिस्तानला कसे उत्तर द्यायचे, लक्ष्य काय असेल, पद्धत आणि वेळ काय असेल आणि कोणता निर्णय कधी घ्यायचा हे लष्कर स्वतः ठरवेल. आता त्यांना सरकारकडून मोकळीक आहे, असे आदेश पंतप्रधानांनी दिल्याचे म्हटलं जात आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी लष्कराला फ्री हॅन्ड देऊन पंतप्रधान मोदी जबाबदारीपासून बाजूला झाल्याचे म्हटलं.

"भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असतात, पंतप्रधान नाही. म्हणून, पंतप्रधानांनी "फ्री हॅन्ड" दिला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांना ते करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रपतींना लष्करी कारवाईची शिफारस करणे हे मंत्रिमंडळाचे काम आहे. पंतप्रधान एकटे हा निर्णय घेऊ शकत नाहीत. दुसरे म्हणजे, ही "फ्री हॅन्ड" दिला म्हणजे मोदींनी स्वतःला जबाबदारीतून मुक्त करण्याचे काम केले आहे. भारतीय सैन्य आपले काम खूप चांगले करते आणि ते कधीही पंतप्रधानांवर अवलंबून राहिलेले नाही. लष्करी निर्णय हे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यातील सहयोगी प्रक्रियेतून होत असतात. मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली याचे मला आश्चर्य वाटते. मोदी राष्ट्रपती का होऊ पाहत आहेत? जसे "पाणी थांबवले" हा जुमला होता, तसेच हा "फ्री हॅन्ड" देखील आहे! उद्या जर भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली तर त्याचे श्रेय फक्त आणि फक्त भारतीय सशस्त्र दलांनाच गेलं पाहिजे," असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली . राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी.एम. सिन्हा, माजी दक्षिणी लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर