शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली

By admin | Updated: July 8, 2015 21:55 IST

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक
आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली
आसनगाव : शहापूर तालुक्यातील भातसा नदीवर कासगावजवळ उभारण्यात येत असलेल्या सह्याद्री रिन्युएबल एनर्जी प्रा.लि. या कंपनीच्या २५ मेगावॅट क्षमतेच्या अपारंपरिक जलविद्युत प्रकल्पामुळे खरिवली गावातील शेतकर्‍यांच्या लागवडीचे क्षेत्र तसेच ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू करताना शेतकर्‍यांना संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
या प्रकल्पात मौजे सापगाव, कासगाव, खरिवली, अर्जुनली येथील अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी हस्तांतरित केल्या होत्या. त्या वेळेस प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला व संरक्षक भिंत बांधून देत नाही, तोपर्यंत तो सुरू करण्याची परवानगी देऊ नये, असा पत्रव्यवहार अधीक्षक अभियंत्यांकडे कार्यकारी अभियंत्यांनी केला होता.
* जनहिताचे प्रकल्प होण्यास आमच्या शेतकरी बांधवांची काहीही हरकत नाही. परंतु, सदर प्रकल्पांत भूमिपुत्रांना नोकरी, जमिनीचा मोबदला, सुरक्षिततेची मागणी यांना प्रथम प्राधान्य द्यावे. - शिवाजी अधिकारी, ग्रामस्थ
* कंपनीने ग्रामस्थांसोबत केलेल्या करारानुसार जनसंरक्षणासाठी भिंत बांधून पुराच्या पाण्यापासून शेतकर्‍यांना वाचवावे व दिलेला शब्द पाळावा. - कुसुम नारायण सासे, पोलीस पाटील