शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली

By admin | Updated: July 8, 2015 21:55 IST

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक
आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली
आसनगाव : शहापूर तालुक्यातील भातसा नदीवर कासगावजवळ उभारण्यात येत असलेल्या सह्याद्री रिन्युएबल एनर्जी प्रा.लि. या कंपनीच्या २५ मेगावॅट क्षमतेच्या अपारंपरिक जलविद्युत प्रकल्पामुळे खरिवली गावातील शेतकर्‍यांच्या लागवडीचे क्षेत्र तसेच ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू करताना शेतकर्‍यांना संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
या प्रकल्पात मौजे सापगाव, कासगाव, खरिवली, अर्जुनली येथील अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी हस्तांतरित केल्या होत्या. त्या वेळेस प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला व संरक्षक भिंत बांधून देत नाही, तोपर्यंत तो सुरू करण्याची परवानगी देऊ नये, असा पत्रव्यवहार अधीक्षक अभियंत्यांकडे कार्यकारी अभियंत्यांनी केला होता.
* जनहिताचे प्रकल्प होण्यास आमच्या शेतकरी बांधवांची काहीही हरकत नाही. परंतु, सदर प्रकल्पांत भूमिपुत्रांना नोकरी, जमिनीचा मोबदला, सुरक्षिततेची मागणी यांना प्रथम प्राधान्य द्यावे. - शिवाजी अधिकारी, ग्रामस्थ
* कंपनीने ग्रामस्थांसोबत केलेल्या करारानुसार जनसंरक्षणासाठी भिंत बांधून पुराच्या पाण्यापासून शेतकर्‍यांना वाचवावे व दिलेला शब्द पाळावा. - कुसुम नारायण सासे, पोलीस पाटील