शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली

By admin | Updated: July 8, 2015 21:55 IST

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक
आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली
आसनगाव : शहापूर तालुक्यातील भातसा नदीवर कासगावजवळ उभारण्यात येत असलेल्या सह्याद्री रिन्युएबल एनर्जी प्रा.लि. या कंपनीच्या २५ मेगावॅट क्षमतेच्या अपारंपरिक जलविद्युत प्रकल्पामुळे खरिवली गावातील शेतकर्‍यांच्या लागवडीचे क्षेत्र तसेच ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू करताना शेतकर्‍यांना संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
या प्रकल्पात मौजे सापगाव, कासगाव, खरिवली, अर्जुनली येथील अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी हस्तांतरित केल्या होत्या. त्या वेळेस प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला व संरक्षक भिंत बांधून देत नाही, तोपर्यंत तो सुरू करण्याची परवानगी देऊ नये, असा पत्रव्यवहार अधीक्षक अभियंत्यांकडे कार्यकारी अभियंत्यांनी केला होता.
* जनहिताचे प्रकल्प होण्यास आमच्या शेतकरी बांधवांची काहीही हरकत नाही. परंतु, सदर प्रकल्पांत भूमिपुत्रांना नोकरी, जमिनीचा मोबदला, सुरक्षिततेची मागणी यांना प्रथम प्राधान्य द्यावे. - शिवाजी अधिकारी, ग्रामस्थ
* कंपनीने ग्रामस्थांसोबत केलेल्या करारानुसार जनसंरक्षणासाठी भिंत बांधून पुराच्या पाण्यापासून शेतकर्‍यांना वाचवावे व दिलेला शब्द पाळावा. - कुसुम नारायण सासे, पोलीस पाटील