शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या धरणांपासून धोका वाढण्याची शक्यता; बहुतांश लोकसंख्या धरणांखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 05:26 IST

काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणत: जुनी होतात. त्यामुळे जगभरातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत फुटण्याचा, तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

न्यूयॉर्क : भारतात २०२५ मध्ये एक हजाराहून अधिक धरणे सुमारे ५० वर्षांची जुनी होणार असून, जगभरात अशा प्रकारची जुनी धरणे भविष्यात धोका वाढविण्याची शक्यता आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की, २०५० पर्यंत जगभरातील बहुतांश लोकसंख्या २०व्या शतकात बांधलेल्या या हजारो धरणांच्या परिसरात वसलेली असेल व धरणे जुनी झाल्यामुळे त्यांना गंभीर धोका निर्माण झालेला असेल. ‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर - ॲन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ या शीर्षकाखाली हा अहवाल संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या कॅनडास्थित जल, पर्यावरण व आरोग्य संस्थेने तयार केला आहे. अहवालात म्हटले आहे की, जगभरातील एकूण ५८,७०० मोठ्या धरणांपैकी बहुतांश धरणांचे काम १९३० ते १९७० या कालावधीत झालेले आहे. ५० ते १०० वर्षांसाठी त्यांचे बांधकाम झालेले आहे. काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणत: जुनी होतात. त्यामुळे जगभरातील हजारो धरणे सध्या धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. त्यांची भिंत फुटण्याचा, तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जुन्या धरणांची दुरुस्ती, देखभालीचा खर्च वाढतो व त्यांची पाणी साठविण्याची क्षमताही कमी होते. २०५० पर्यंत जगभरातील बहुतांश लोकसंख्या या धरणांच्या खाली वसलेली असेल. भारत, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, झांबिया व झिम्बाब्वे या देशांतील धरणांचे अध्ययन केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

... तर ३५ लाख लोकांना धोका निर्माण होऊ शकतोसंयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की, जगातील एकूण धरणांच्या ५५ टक्के म्हणजेच ३२,७१६ मोठी धरणे चीन, भारत, जपान व दक्षिण कोरिया या चार आशियाई देशांतील आहेत. यातील बहुतांश धरणे लवकरच ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी होणार आहेत.एकट्या भारतात १,११५ मोठी धरणे २०२५ मध्ये ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी होणार आहेत.देशातील ४,२५० पेक्षा अधिक मोठी धरणे २०५० मध्ये ५० वर्षांपेक्षा जुनी होणार आहेत. ६४ मोठी धरणे २०५० मध्ये १५० वर्षांपेक्षा जास्त जुनी होणार आहेत.भारताच्या केरळमधील मुल्लापेरियार धरण १०० वर्षांपूर्वी बनविलेले असेल व त्याला काही झालेच तर सुमारे ३५ लाख लोकांना धोका निर्माण होऊ शकतो.

 

टॅग्स :Damधरण