शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमुळे हिमालयात मोठ्या विनाशाची शक्यता; पर्वतांच्या भौगोलिक स्थितीमध्येही होताहेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:07 IST

जोशीमठमध्ये होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमागे मानवी हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना आणि घरांना तडे गेल्यामुळे रस्ते आणि घरे जमिनीत सामावले जाण्याची भीती आहे. ही नैसर्गिक आपत्ती हिमालयातील बदलामुळे होत आहे. मग मोठी धरणे बांधणे असो किंवा प्रकल्पांची उभारणी, ज्यामुळे हिमालयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिमालयात धरणे बांधल्यास मोठे नुकसान होऊ शकते, अशा शिफारशी पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. त्याचे जिवंत उदाहरण टिहरी धरणावरील एका शोधनिबंधाच्या अहवालात आले आहे. धरणाच्या रिझर्व्ह वायरमुळे हिमालयातील जीपीएस प्रणालीत बदल होत आहे. 

उत्तराखंडमधील धरणांमुळे अनेक प्रकारच्या समस्या आहेत. टिहरी धरणावरील एका शोधनिबंधानुसार एक रिपोर्ट तयार करण्यात आली आहे. उत्तराखंडसाठी मोठी धरणे हिमालयीन प्रदेशासाठी मोठे नुकसान असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे धरण तेहरी धरण आहे. जगातील 8 मोठ्या धरणांमध्ये टेहरी धरणाचे नाव आहे. शोधनिबंधाच्या अहवालात असे आढळून आले की, टेहरी धरणाचा साठा पूर्णपणे भरल्यास आजुबाजूची डोंगर जवळ येतात. हे वर्षातून दोनदा घडते, यामुळे त्या डोंगरांचे जीपीएस स्थानही बदलत आहे. 

या धरणांमुळे हिमालयीन डोंगरांची भौगोलिक स्थिती बदलत आहे. यामुळे आगामी काळात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भौगोलिक स्थिती अथवा जीपीएस बदलणे म्हणजे खडक किंवा प्लेट्स हळूहळू पर्वतांच्या आत सरकत आहेत. रिसर्च पेपरच्या अहवालात शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की, 42 किलोमीटर लांबीच्या टिहरी धरणाच्या आसपासच्या भागात वेगाने भूस्खलनही होत आहे. उत्तराखंडमध्ये गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये 70 हून अधिक जलविद्युत प्रकल्प बांधले जात आहेत. यातील अनेक जलविद्युत प्रकल्पांमुळे जवळपासच्या गावांचे आणि शहरांचे नुकसान झाले आहे. बोगद्याच्या बांधकामामुळेही शहराला भेगा पडल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत2013 च्या आपत्तीनंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे उद्दिष्ट उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात बांधण्यात येत असलेल्या धरणांचा परिणाम पाहणे हा होता. समितीने आपल्या अहवालात जोशीमठच्या तपोवन विष्णुगड प्रकल्पासह अनेक शिफारशी केल्या आहेत. जोशीमठ एमसीटी म्हणजेच मेन सेंट्रल थ्रस्ट झोनमध्ये येत असल्याने त्याच्या उत्तरेला प्रकल्प उभारू नये, असे म्हटले होते. पण, समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडEarthquakeभूकंपNatureनिसर्ग