शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

धरणांमुळे हिमालयात मोठ्या विनाशाची शक्यता; पर्वतांच्या भौगोलिक स्थितीमध्येही होताहेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:07 IST

जोशीमठमध्ये होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमागे मानवी हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये मोठे नैसर्गिक संकट आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना आणि घरांना तडे गेल्यामुळे रस्ते आणि घरे जमिनीत सामावले जाण्याची भीती आहे. ही नैसर्गिक आपत्ती हिमालयातील बदलामुळे होत आहे. मग मोठी धरणे बांधणे असो किंवा प्रकल्पांची उभारणी, ज्यामुळे हिमालयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिमालयात धरणे बांधल्यास मोठे नुकसान होऊ शकते, अशा शिफारशी पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात केल्या आहेत. त्याचे जिवंत उदाहरण टिहरी धरणावरील एका शोधनिबंधाच्या अहवालात आले आहे. धरणाच्या रिझर्व्ह वायरमुळे हिमालयातील जीपीएस प्रणालीत बदल होत आहे. 

उत्तराखंडमधील धरणांमुळे अनेक प्रकारच्या समस्या आहेत. टिहरी धरणावरील एका शोधनिबंधानुसार एक रिपोर्ट तयार करण्यात आली आहे. उत्तराखंडसाठी मोठी धरणे हिमालयीन प्रदेशासाठी मोठे नुकसान असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे धरण तेहरी धरण आहे. जगातील 8 मोठ्या धरणांमध्ये टेहरी धरणाचे नाव आहे. शोधनिबंधाच्या अहवालात असे आढळून आले की, टेहरी धरणाचा साठा पूर्णपणे भरल्यास आजुबाजूची डोंगर जवळ येतात. हे वर्षातून दोनदा घडते, यामुळे त्या डोंगरांचे जीपीएस स्थानही बदलत आहे. 

या धरणांमुळे हिमालयीन डोंगरांची भौगोलिक स्थिती बदलत आहे. यामुळे आगामी काळात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भौगोलिक स्थिती अथवा जीपीएस बदलणे म्हणजे खडक किंवा प्लेट्स हळूहळू पर्वतांच्या आत सरकत आहेत. रिसर्च पेपरच्या अहवालात शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की, 42 किलोमीटर लांबीच्या टिहरी धरणाच्या आसपासच्या भागात वेगाने भूस्खलनही होत आहे. उत्तराखंडमध्ये गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये 70 हून अधिक जलविद्युत प्रकल्प बांधले जात आहेत. यातील अनेक जलविद्युत प्रकल्पांमुळे जवळपासच्या गावांचे आणि शहरांचे नुकसान झाले आहे. बोगद्याच्या बांधकामामुळेही शहराला भेगा पडल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत2013 च्या आपत्तीनंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे उद्दिष्ट उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात बांधण्यात येत असलेल्या धरणांचा परिणाम पाहणे हा होता. समितीने आपल्या अहवालात जोशीमठच्या तपोवन विष्णुगड प्रकल्पासह अनेक शिफारशी केल्या आहेत. जोशीमठ एमसीटी म्हणजेच मेन सेंट्रल थ्रस्ट झोनमध्ये येत असल्याने त्याच्या उत्तरेला प्रकल्प उभारू नये, असे म्हटले होते. पण, समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडEarthquakeभूकंपNatureनिसर्ग