शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात 'धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद'चे पोस्टर; FIR दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 13:24 IST

Protest Against Dhirendra Krishna Shastri : मध्य प्रदेशात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. 

Dhirendra Krishna Shastri News : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी साई बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. मध्य प्रदेशातील कलचुरी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सहस्त्रबाहू महाराज यांच्याबद्दल देखील शास्त्री यांनी एक आक्षेपार्ह विधान केले होते. ज्यावरून अद्याप वाद सुरूच असल्याचे दिसते. धीरेंद्र शास्त्री यांनी सहस्त्रबाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे हैहयवंशी कलचुरी समाजाकडून शास्त्री यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली. 

दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्यानंतर दिलगिरी देखील व्यक्त केली होती. पण हैहयवंशी समाज यावर समाधानी नसल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच राजधानी भोपाळ येथे या समाजाने शास्त्री यांना विरोध दर्शवला होता. पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेचे पोस्टर अनेक वाहनांवर लावण्यात आले होते. दुसरीकडे, हैहयवंशी समाज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीवर ठाम आहे. शास्त्री यांनी खेद व्यक्त केला असला तरी त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार भाष्य केले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे, असा त्यांनी दावा केल्याचा आरोप कलचुरी सेनेच्या अध्यक्षांनी केला आहे. याप्रकरणी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेतली असून, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे कलचुरी समाजाने स्पष्ट केले. शास्त्री यांनी व्यक्त केला खेद वाढता वाद पाहून धीरेंद्र शास्त्री यांनी महाराज सहस्त्रबाहू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला होता, मात्र त्यांनी माफी मागितली नव्हती. "भगवान परशुराम आणि महाराज सहस्त्रबाहू अर्जुन यांच्यातील युद्धाबद्दल मी जे काही बोललो आहे ते आमच्या पवित्र हिंदू धर्मग्रंथात वर्णन केलेल्या आधारावर सांगितले आहे", असे शास्त्री यांनी म्हटले होते. 

"कोणत्याही समाजाच्या किंवा वर्गाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. आम्ही सनातनच्या एकतेच्या बाजूने नेहमीच उभे राहिलो आहोत. तरीही आमच्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आम्ही सर्व हिंदू एक आहोत आणि एकच राहतील. आमची एकता हीच आमची ताकद आहे", असे स्पष्टीकरण धीरेंद्र शास्त्री यांनी दिले होते. 

 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेशHinduहिंदू