शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोदी सरकारला झटका; एका चुकीमुळे 780 बेनामी मालमत्तांची जप्ती अवैध ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 09:23 IST

७८० हून अधिक बेनामी मालमत्तांच्या जप्तीची कारवाई अवैध ठरण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : काळा पैसा खणून काढण्याकरिता व भ्रष्टाचार संपविण्यासाठी मोदी सरकारने बेनामी मालमत्ताविषयक कायद्यात दुरुस्ती करुन नवा कायदा १ नोव्हेंबर २०१६ अमलात आणला. हा कायदा केल्यानंतर पुढील दीड वर्षात त्यासाठी आवश्यक असलेली समिती सरकारने स्थापन न केल्याने ७८० हून अधिक बेनामी मालमत्तांच्या जप्तीची कारवाई अवैध ठरण्याची शक्यता आहे.

१९८८ साली अमलात आलेल्या बेनामी मालमत्ता कायद्यामध्ये सुधारणा करुन नवा कायदा अमलात आणला त्याच महिन्यात मोदी सरकारने नोटाबंदीचे पाऊलही उचलले होते. ज्याची बेनामी मालमत्ता आहे त्या व्यक्तीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच बेनामी मालमत्तेच्या एकुण किमतीच्या २५ टक्के दंड ठोठावण्याची तरतुद नव्या बेनामी मालमत्ता व्यवहार कायद्यात करण्यात आली आहे. प्राप्तीकर खात्याने बेनामी मालमत्ता जप्त केल्याची कारवाई वैध आहे की नाही हे ठरविण्यासाठी तीन स्वतंत्र सदस्यांची समिती स्थापन करणे आवश्यक आहे. तशी तरतूद या कायद्यातील सातव्या कलमात आहे. मात्र तशी समितीच नेमण्याची बुद्धी सरकारला झालेली नाही....तर लोक न्यायालयात जातीलगेल्या दीड वर्षात ८६०हून बेनामी मालमत्ता प्राप्तीकर खात्याने जप्त केल्या. त्यातील ८० प्रकरणे या समितीकडे पाठविण्यात निश्चित करण्यात आले. पण अन्य ७८० बेनामी मालमत्ता प्रकरणांबाबत कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. अनेक महत्त्वाचे राजकारणी, व्यक्ती, नोकरशहा व अन्य काही जणांच्या या बेनामी मालमत्ता आहेत. पण ज्या समितीकडे ही प्रकरणे पाठवायची तिच स्थापन न झाल्याने सगळा पेच निर्माण झाला आहे. ही समिती योग्य मुदतीत स्थापन न झाल्यास ज्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत ते लोक न्यायालयात धाव घेतील व तिथे केंद्र सरकारची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे असे वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण