शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गांजाचा वापर कायदेशीर ठरविण्यासाठी संसदेत विधेयक येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 13:55 IST

आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संसदेत गेलेल्या धर्मवीर गांधी यांनी गांजाला कायदेशीर ठरविण्यासाठी खासगी विधेयक मांडले होते. हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. पतियाळा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे धर्मवीर गांधी हे स्वतः हृदयरोगतज्ज्ञ आहेत.

ठळक मुद्देगांजा ही एक स्टेपिंग स्टेप म्हणजे नशेच्या बाजारातले पहिले पाऊल ठरण्याची सर्वाधीक भीती असते. एकदा हे पाऊल पडलं की त्याच्या पुढची पावलं वेगाने पडायला लागतात आणि नशेच्या विळख्यात अधिकाधिक गुंतायला होते

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संसदेत गेलेल्या धर्मवीर गांधी यांनी गांजाला कायदेशीर ठरविण्यासाठी खासगी विधेयक मांडले होते. हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. पतियाळा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे धर्मवीर गांधी हे स्वतः हृदयरोगतज्ज्ञ आहेत. गेली अनेक वर्षे ते गांजा कायदेशीर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.

2013 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये आदित्य बरठाकूर यांनी गांजाला कायदेशीर ठरावा अशा आशयाची याचिका दाखल केली होती. भारतामध्ये अनेकदा काही संस्थांनी आणि व्यक्तींनी गांजाचे वैद्यकीय उपयोग दाखवत त्यासाठी प्रयत्न केले आहेत. यापूर्वी बिजू जनता दलाचे खासदार तथागत सत्पती आणि केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही गांजा कायदेशीर करण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. 

भारतामध्ये गेली अनेक शतके गांजा विविध कारणांसाठी वापरला जातो. भारताच्या काही भागांमध्ये त्याला धार्मिक आणि सांस्कृतीक स्थानही देण्यात आले आहे. विशेषतः उत्तर भारतामध्ये त्याचा वापर धार्मिक कारणांखाली केला जातो. मात्र गांजाचा वापर कायदेशीर केल्यानंतर ते किती प्रमाणात व कोणी वापरायचे तसेच कोण्ताय कारणांसाठी वापरायचे याबाबत गोंधळ होण्याची शक्यता आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच गांजाच्या अतीवापरामुळे आणि त्याच्या सवयीमुळे वेडाचे झटके किंवा इतर मानसिक, शारीरिक त्रासही होऊ शकतात. तसेच ही गांजा ही एक स्टेपिंग स्टेप म्हणजे नशेच्या बाजारातले पहिले पाऊल ठरण्याची सर्वाधीक भीती असते. एकदा हे पाऊल पडलं की त्याच्या पुढची पावलं वेगाने पडायला लागतात आणि नशेच्या विळख्यात अधिकाधिक गुंतायला होते त्यामुळे गांजा भारतामध्ये कायदेशीर ठरणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांना वाटते. काही देशांमध्ये गांजाचा वापर कायदेशीर करण्यात आला आहे.

टॅग्स :Indiaभारत