शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:42 IST

भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे

नवी दिल्ली : भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता केले.नौदलाच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर दिवसभराच्या सफरीसाठी गेलेल्या राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना अशी ग्वाही दिली दिली की, भारताच्या पश्चिमकिनाऱ्यावर नौदलाची प्रबळ उपस्थिती असल्याने मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती कदापि होऊ दिली जाऊ शकत नाही.ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत काय झाले हे कदापि विसरता येणार नाही. एकदा झालेली चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा होऊ दिली जाऊ शकत नाही. म्हणूनच आपले नौदल आणि तटरक्षकदल सदैव तत्पर असतात. याविषयी जराही शंका घेणचे कारण नाही. समुद्रमार्गे पुन्हा हल्ला होण्याच्या शक्यतेविषयी विचारता संरक्षणमंत्री म्हणाले की, जगातील कोणत्याही देशाला स्वत:च्या संरक्षणासाठी चोख उपाय योजावेच लागतात. भारताने हवाई हल्ला करून उद््ध्वस्त केलेला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ पाकिस्तानने पुन्हा सुरू केला आहे व तेथे प्रशिक्षण दिलेले दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत सीमेवर आहेत, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच म्हटले होते. त्याविषयी विचारता राजनाथ सिंह म्हणाले की, हे दहशतवादी कोण पाठविते हे जसे सर्व जगाला माहीत आहे.पाकने युद्धाचा विचारही करू नयेपाकिस्तानने भारताशी पुन्हा युद्ध करण्याचा विचारही करू नये, असे स्पष्टपणे बजावताना शनिवारी मुंबईत राजनाथसिंह म्हणाले होते की, सरकारचा दृढ निर्धार आणि ‘आयएनएस खंदेरी’ विनाशिकेसह अन्य युद्धनौकांनी भारतीय नौदलाचे वाढलेले बळ पाहता आता युद्ध झाल्यास १९७१ पेक्षाही मोठी हानी पाकिस्तानला सोसावी लागेल.

टॅग्स :TerrorismदहशतवादRajnath Singhराजनाथ सिंह