शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:42 IST

भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे

नवी दिल्ली : भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता केले.नौदलाच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर दिवसभराच्या सफरीसाठी गेलेल्या राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना अशी ग्वाही दिली दिली की, भारताच्या पश्चिमकिनाऱ्यावर नौदलाची प्रबळ उपस्थिती असल्याने मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती कदापि होऊ दिली जाऊ शकत नाही.ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत काय झाले हे कदापि विसरता येणार नाही. एकदा झालेली चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा होऊ दिली जाऊ शकत नाही. म्हणूनच आपले नौदल आणि तटरक्षकदल सदैव तत्पर असतात. याविषयी जराही शंका घेणचे कारण नाही. समुद्रमार्गे पुन्हा हल्ला होण्याच्या शक्यतेविषयी विचारता संरक्षणमंत्री म्हणाले की, जगातील कोणत्याही देशाला स्वत:च्या संरक्षणासाठी चोख उपाय योजावेच लागतात. भारताने हवाई हल्ला करून उद््ध्वस्त केलेला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ पाकिस्तानने पुन्हा सुरू केला आहे व तेथे प्रशिक्षण दिलेले दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत सीमेवर आहेत, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच म्हटले होते. त्याविषयी विचारता राजनाथ सिंह म्हणाले की, हे दहशतवादी कोण पाठविते हे जसे सर्व जगाला माहीत आहे.पाकने युद्धाचा विचारही करू नयेपाकिस्तानने भारताशी पुन्हा युद्ध करण्याचा विचारही करू नये, असे स्पष्टपणे बजावताना शनिवारी मुंबईत राजनाथसिंह म्हणाले होते की, सरकारचा दृढ निर्धार आणि ‘आयएनएस खंदेरी’ विनाशिकेसह अन्य युद्धनौकांनी भारतीय नौदलाचे वाढलेले बळ पाहता आता युद्ध झाल्यास १९७१ पेक्षाही मोठी हानी पाकिस्तानला सोसावी लागेल.

टॅग्स :TerrorismदहशतवादRajnath Singhराजनाथ सिंह