शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:42 IST

भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे

नवी दिल्ली : भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता केले.नौदलाच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर दिवसभराच्या सफरीसाठी गेलेल्या राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना अशी ग्वाही दिली दिली की, भारताच्या पश्चिमकिनाऱ्यावर नौदलाची प्रबळ उपस्थिती असल्याने मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती कदापि होऊ दिली जाऊ शकत नाही.ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत काय झाले हे कदापि विसरता येणार नाही. एकदा झालेली चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा होऊ दिली जाऊ शकत नाही. म्हणूनच आपले नौदल आणि तटरक्षकदल सदैव तत्पर असतात. याविषयी जराही शंका घेणचे कारण नाही. समुद्रमार्गे पुन्हा हल्ला होण्याच्या शक्यतेविषयी विचारता संरक्षणमंत्री म्हणाले की, जगातील कोणत्याही देशाला स्वत:च्या संरक्षणासाठी चोख उपाय योजावेच लागतात. भारताने हवाई हल्ला करून उद््ध्वस्त केलेला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ पाकिस्तानने पुन्हा सुरू केला आहे व तेथे प्रशिक्षण दिलेले दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत सीमेवर आहेत, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच म्हटले होते. त्याविषयी विचारता राजनाथ सिंह म्हणाले की, हे दहशतवादी कोण पाठविते हे जसे सर्व जगाला माहीत आहे.पाकने युद्धाचा विचारही करू नयेपाकिस्तानने भारताशी पुन्हा युद्ध करण्याचा विचारही करू नये, असे स्पष्टपणे बजावताना शनिवारी मुंबईत राजनाथसिंह म्हणाले होते की, सरकारचा दृढ निर्धार आणि ‘आयएनएस खंदेरी’ विनाशिकेसह अन्य युद्धनौकांनी भारतीय नौदलाचे वाढलेले बळ पाहता आता युद्ध झाल्यास १९७१ पेक्षाही मोठी हानी पाकिस्तानला सोसावी लागेल.

टॅग्स :TerrorismदहशतवादRajnath Singhराजनाथ सिंह