शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Poonch terror attack : इफ्तारसाठी ट्रकमधून फळे घेऊन जात होते जवान; गावकरी म्हणाले, "ईद साजरी करणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 11:23 IST

इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी निघालेल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याने गावातील लोक दु:खी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये गुरुवारी (20 एप्रिल) लष्कराच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 5 जवान शहीद झाले. या घटनेनंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, हा भ्याड हल्ला झाला, त्यावेळी हे लष्करी जवान पूंछमधील एका गावात आयोजित इफ्तार पार्टीसाठी ट्रकमधून फळे आणि इतर वस्तू घेऊन जात होते. या इफ्तार पार्टीत उपवास करणाऱ्यांसोबत त्या गावचे पंच, सरपंच यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, राष्ट्रीय रायफल्स (RR) च्या जवानांनी 20 एप्रिलच्या संध्याकाळी सैंगोट भागात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी लष्करांकडून अशा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. इफ्तार पार्टीच्या या आयोजनामुळे दहशतवादी नाराज झाले होते. त्यामुळेच दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.

इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी निघालेल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याने सैंगोट गावातील लोक दु:खी झाले आहेत. या हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत गावातील लोकांनी यावेळी ईद साजरी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना सर्वात मोठी भीती ही असते की लोकांनी लष्कराला आपला मित्र मानू नये, असे झाले तर ते लोकांना भडकावू शकणार नाहीत. यामुळेच दहशतवाद्यांना लोकांचा लष्कराशी संबंध आवडत नाही. लष्कराशी संवाद साधणाऱ्या लोकांकडे दहशतवादी संशयाने पाहतात. 

सैंगोट येथे होणार्‍या इफ्तार पार्टीची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद्यांनी हल्ल्याची योजना आखली. लष्कराचा ट्रक इफ्तारचे साहित्य घेऊन कॅम्पकडे परतत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी वाहनाला लक्ष्य केले. यावेळी अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी आधी गोळ्या झाडल्या, त्यानंतर ग्रेनेडने हल्ला केला. त्यात 5 जवान शहीद झाले. या घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दहशतवाद्यांचा शोध सुरूया हल्ल्यात हवालदार मनदीप सिंग, हरकिशन सिंग, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई सेवक सिंग आणि लान्स नाईक देबाशिष बसवाल हे पाच जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा दल संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. दुसरीकडे, या हल्ल्याची जबाबदारी पीएएफएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी पीएएफएफ संबंधित आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान