शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

नद्यांचे प्रदूषित भाग सतत वाढत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 01:09 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष; देशात दोन वर्षांपूर्वी ३०२, आता ३५१

नवी दिल्ली : देशातील नद्यांचे प्रदूषित भाग दोन वर्षांपूर्वी ३०२ होते ते यावर्षी ३५१ झाले असून, अतिशय गंभीररीत्या प्रदूषित झालेल्या नद्यांचे भाग (जेथे पाण्याचा दर्जा कसा आहे हे समजते) ३४ वरून ४५ झाले आहेत. हा निष्कर्ष केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) काढला आहे.केंद्र सरकार गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प राबवत असून, प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी तो दृश्य स्वरूपातील प्रयत्न आहे. सीपीसीबीने बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांचे भाग हे प्रत्यक्ष महाराष्ट्र, आसाम आणि गुजरातमधील नद्यांपेक्षा खूप कमी प्रदूषित आहेत, असे म्हटले. नद्यांच्या प्रदूषित झालेल्या ३५१ भागांपैकी ११७ भाग हे या तीन राज्यांतील आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या शिफारशींच्या आधारे सीपीसीबीने गेल्या महिन्यात राज्यांना त्यांच्या नद्या किती प्रदूषित झाल्या आहेत, हे कळवले आहे. सीपीसीबीने प्रदूषित भागांकडे लक्ष वेधले आहे त्यात मिठी नदीत (पोवई ते धारावी) बीओडी (बायोकेमिकल आॅक्सिजन डिमांड) २५० मिलीग्रॅम/लिटर, गोदावरीत (सोमेश्वर ते राहेद) बीओडी ५.०-८० मिलीग्रॅम/लिटर, साबरमती (खेरोज ते वौथा) बीओडी ४.०-१४७ मिलीग्रॅम/लिटर आणि हिंडोन (सहारनपूर ते गाझियाबाद) बीओडी ४८-१२० मिलीग्रॅम/लिटर आहे.देशातील अनेक नद्या खूप प्रमाणात प्रदूषितउत्तर प्रदेशातील नद्यांच्या प्रदूषित भागांच्या केलेल्या संकलनात गंगेत बीओडीचे प्रमाण ३.५-८.८ मिलीग्रॅम/लिटर असून, ही नदी प्रायोरिटी फोरमध्ये असल्याचे संकेत आहेत. गंगा नदीचे सांस्कृतिक महत्त्व मोठे असल्यामुळे तिच्यावर सतत प्रकाशझोत असतो; परंतु अनेक नद्या खूप प्रमाणात प्रदूषित आहेत, असे केंद्रीय जल संसाधन मंत्रालयातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण