शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

निवडणुकीचा शेवटचा टप्पा, तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरीमध्ये मतदान

By admin | Published: May 16, 2016 8:41 AM

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज होत असून, तामिळनाडू, केरळ आणि पुडूच्चेरीमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. १६- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज होत असून, तामिळनाडू, केरळ आणि पुडूच्चेरीमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, एम करुणानिधी आणि व्ही.एस.अच्युतानंदन हे प्रमुख नेते निवडणूक रिंगणात आहेत. 
 
तामिळनाडू, केरळ, पुडूच्चेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे. तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये पक्षविस्ताराच्या दृष्टीने भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३३ जागांसाठी ३,७७६ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३२० महिला आहेत. ५.८२ कोटी मतदारांकडे मतदानाचा अधिकार आहे. तामिळनाडूत एकूण ६५,६०० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 
 
द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख पक्ष आहेत. १९६७ पासून या दोन पक्षांमध्ये मुख्य लढत राहिली आहे. केरळमध्ये सत्ताधारी यूडीएफ आणि एलडीएफमध्ये मुख्य लढत आहे. केरळमध्ये भाजपला राजकीय अस्तित्व निर्माण करायचे असल्याने त्यांनी इथे पूर्ण ताकत लावली आहे. केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठी १२०३ उमेदवार रिंगणात आहेत. यात १०९ महिला आहेत. 
 
पुडूच्चेरीमध्ये दोन काँग्रेसपक्षांमध्येच लढत आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एन.रंगासॅमी यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. पुडूच्चेरीमध्ये तीस जागांसाठी ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. यात २१ महिला आहेत.