शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धर्माशिवाय राजकारण निरर्थक - नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:28 IST

भाजप सकारात्मक विचारांचा पक्ष; धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते

वडोदरा : धर्म माणसाला नैतिक आचरणाचे धडे देतो. धर्माशिवाय राजकारण निरर्थक आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. स्वामीनारायण पंथातर्फे येथे शुक्रवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.नड्डा म्हणाले की, राजकारणाचा धर्माशी काय संबंध, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. धर्माशिवाय राजकारण हे विवेकहीन ठरेल. राजकारण व धर्म एकमेकांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत. धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते. काय करावे व काय करू नये, याची शिकवण त्याच्याकडून मिळते. त्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे. राजकारणात तर त्याची मोठी गरज आहे. भाजप हा सकारात्मक विचारांचा पक्ष आहे. देशाच्या व समाजाच्या भल्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याचा विचार करून भाजप कृती करतो, असा दावाही त्यांनी केला.त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी जेव्हा जेव्हा रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा मोदी यांनी सारे अडथळे दूर सारले व आपले कार्य आणखी जोमात सुरू ठेवले. अशा खडतर काळात पंतप्रधानांच्या अंगी आणखी ऊर्जा संचारते. देशाच्या विकासासाठी मोदी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्याकरिता राबविलेली उज्ज्वला योजना अतिशय सफल ठरली आहे, असाही दावा नड्डा यांनी केला. (वृत्तसंस्था)देशातील वनक्षेत्रामध्ये वाढजे.पी. नड्डा म्हणाले की, मोदी यांच्या राजवटीत भारतातील वनक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.घराघरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पोहोचल्याने जंगलातून जळणासाठी लाकूडफाटा तोडून आणण्याचे व चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.उज्ज्वला योजनेंतर्गत देशात स्वयंपाकाच्या गॅसच्या ८ कोटी जोडण्या आतापर्यंत देण्यात आल्या. चुलीच्या धुराच्या त्रासापासून सुटका झाल्यामुळे घराघरांतील महिलांचे आरोग्यही सुधारले आहे.सीएएविरोधात दिल्लीत मोर्चानागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत शुक्रवारी महिला आणि विविध समुदायाच्या नागरिकांनी मंडी हाउस ते जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढला.या कायद्याविरोधात नाराजी व्यक्त करीत त्यांनी घोषणाबाजी केली.मालवीयनगर येथील कामगार शांती देवी म्हणाल्या की, असा कायदा आणण्याऐवजी सरकारने गरिबीसारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, तसेच सर्व लोकांना व्यवस्थित अन्न मिळते का? याकडे लक्ष द्यावे.