शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धर्माशिवाय राजकारण निरर्थक - नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:28 IST

भाजप सकारात्मक विचारांचा पक्ष; धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते

वडोदरा : धर्म माणसाला नैतिक आचरणाचे धडे देतो. धर्माशिवाय राजकारण निरर्थक आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. स्वामीनारायण पंथातर्फे येथे शुक्रवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.नड्डा म्हणाले की, राजकारणाचा धर्माशी काय संबंध, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. धर्माशिवाय राजकारण हे विवेकहीन ठरेल. राजकारण व धर्म एकमेकांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत. धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते. काय करावे व काय करू नये, याची शिकवण त्याच्याकडून मिळते. त्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे. राजकारणात तर त्याची मोठी गरज आहे. भाजप हा सकारात्मक विचारांचा पक्ष आहे. देशाच्या व समाजाच्या भल्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याचा विचार करून भाजप कृती करतो, असा दावाही त्यांनी केला.त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी जेव्हा जेव्हा रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा मोदी यांनी सारे अडथळे दूर सारले व आपले कार्य आणखी जोमात सुरू ठेवले. अशा खडतर काळात पंतप्रधानांच्या अंगी आणखी ऊर्जा संचारते. देशाच्या विकासासाठी मोदी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्याकरिता राबविलेली उज्ज्वला योजना अतिशय सफल ठरली आहे, असाही दावा नड्डा यांनी केला. (वृत्तसंस्था)देशातील वनक्षेत्रामध्ये वाढजे.पी. नड्डा म्हणाले की, मोदी यांच्या राजवटीत भारतातील वनक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.घराघरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पोहोचल्याने जंगलातून जळणासाठी लाकूडफाटा तोडून आणण्याचे व चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.उज्ज्वला योजनेंतर्गत देशात स्वयंपाकाच्या गॅसच्या ८ कोटी जोडण्या आतापर्यंत देण्यात आल्या. चुलीच्या धुराच्या त्रासापासून सुटका झाल्यामुळे घराघरांतील महिलांचे आरोग्यही सुधारले आहे.सीएएविरोधात दिल्लीत मोर्चानागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत शुक्रवारी महिला आणि विविध समुदायाच्या नागरिकांनी मंडी हाउस ते जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढला.या कायद्याविरोधात नाराजी व्यक्त करीत त्यांनी घोषणाबाजी केली.मालवीयनगर येथील कामगार शांती देवी म्हणाल्या की, असा कायदा आणण्याऐवजी सरकारने गरिबीसारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, तसेच सर्व लोकांना व्यवस्थित अन्न मिळते का? याकडे लक्ष द्यावे.