शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

धर्माशिवाय राजकारण निरर्थक - नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:28 IST

भाजप सकारात्मक विचारांचा पक्ष; धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते

वडोदरा : धर्म माणसाला नैतिक आचरणाचे धडे देतो. धर्माशिवाय राजकारण निरर्थक आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. स्वामीनारायण पंथातर्फे येथे शुक्रवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.नड्डा म्हणाले की, राजकारणाचा धर्माशी काय संबंध, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. धर्माशिवाय राजकारण हे विवेकहीन ठरेल. राजकारण व धर्म एकमेकांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत. धर्म ही एक प्रकारची आचारसंहिता असते. काय करावे व काय करू नये, याची शिकवण त्याच्याकडून मिळते. त्यासाठी धर्माची नितांत आवश्यकता आहे. राजकारणात तर त्याची मोठी गरज आहे. भाजप हा सकारात्मक विचारांचा पक्ष आहे. देशाच्या व समाजाच्या भल्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याचा विचार करून भाजप कृती करतो, असा दावाही त्यांनी केला.त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी जेव्हा जेव्हा रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा मोदी यांनी सारे अडथळे दूर सारले व आपले कार्य आणखी जोमात सुरू ठेवले. अशा खडतर काळात पंतप्रधानांच्या अंगी आणखी ऊर्जा संचारते. देशाच्या विकासासाठी मोदी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्याकरिता राबविलेली उज्ज्वला योजना अतिशय सफल ठरली आहे, असाही दावा नड्डा यांनी केला. (वृत्तसंस्था)देशातील वनक्षेत्रामध्ये वाढजे.पी. नड्डा म्हणाले की, मोदी यांच्या राजवटीत भारतातील वनक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.घराघरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पोहोचल्याने जंगलातून जळणासाठी लाकूडफाटा तोडून आणण्याचे व चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.उज्ज्वला योजनेंतर्गत देशात स्वयंपाकाच्या गॅसच्या ८ कोटी जोडण्या आतापर्यंत देण्यात आल्या. चुलीच्या धुराच्या त्रासापासून सुटका झाल्यामुळे घराघरांतील महिलांचे आरोग्यही सुधारले आहे.सीएएविरोधात दिल्लीत मोर्चानागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत शुक्रवारी महिला आणि विविध समुदायाच्या नागरिकांनी मंडी हाउस ते जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढला.या कायद्याविरोधात नाराजी व्यक्त करीत त्यांनी घोषणाबाजी केली.मालवीयनगर येथील कामगार शांती देवी म्हणाल्या की, असा कायदा आणण्याऐवजी सरकारने गरिबीसारख्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, तसेच सर्व लोकांना व्यवस्थित अन्न मिळते का? याकडे लक्ष द्यावे.